भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक
By Admin | Updated: April 21, 2016 00:14 IST2016-04-21T00:04:30+5:302016-04-21T00:14:01+5:30
सिन्नर : लोकोपयोगी निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन

भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक
सिन्नर : केंद्र व राज्य सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव यांनी केले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, सरचिटणीस भाऊराव निकम, बापूसाहेब पाटील, सचिन ठाकरे
आदि जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जाधव बोलत होते. ग्रामोदय ते भारत उदय या अभियानाविषयी कार्यकर्त्यांना बैठकीत माहिती देण्यात येऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुका सरचिटणीस सोमनाथ भिसे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सरचिटणीस भाऊराव निकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला.
अडचणी आल्यास जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा, पालकमंत्र्यांकडून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले.
भाजपाचे सिन्नर तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांनी तालुक्यातील गावागावात जाऊन दुष्काळीने होरपळत असलेल्या जनतेला प्रत्यक्ष भेटून अडीअडचणी जाणून घेत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी पद्माकर गुजराथी, शहराध्यक्ष पंकज जाधव, भाऊसाहेब शिंदे, रामनाथ डावरे, राजेंद्र कपोते, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, महादू शिंदे, दशरथ शिंदे, किसन शिंदे, सुनील माळी, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष सविता कोेठूरकर, महिला शहर आघाडीच्या अध्यक्ष मंगला गोसावी, अनिल पाटील, सोपान पडवळ, दत्तू गवळी, वैभव आव्हाड, ज्योती चौघुले, जयश्री महानुभाव, शीतल देवरे, दीपाली घोटेकर, सुनीता परदेशी, स्वप्नाली सोनवणे, अंजनाबाई सांगळे, दत्तू आरोटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)