शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

कमाल तपमान ३४.८ : नाशिककरांना वाढत्या उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 21:50 IST

सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८अंशापर्यंत वर सरकला तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी पाणी भरपूर पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेतथंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर केलेला उत्तम

नाशिक : मार्च महिन्याला प्रारंभ होताच शहराच्या कमाल तपमानात वाढ होत आहे. सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८अंशापर्यंत वर सरकला तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे.फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा तीव्र स्वरुपात जाणवू लागल्या. हवामानातही बदल झाला असून मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी ३६.२ तर दुस-या दिवशी ३६.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानात काही अंशी घट झाली असली तरी वातावरणातील उष्मा कायम आहे. उन्हाची तीव्रता कायम असून तपमानाचा पारादेखील ३५ अंशाच्या जवळपास स्थिरावत आहे. मार्च महिना संपूर्णत: ‘हॉट’ राहणार असून शहराच्या कमाल तपमानात वाढ होण्याची शक्यता हवामानखात्याकडून वर्तविली जात आहे.नाशिक, नंदूरबार, जळगाव, मालेगाव या शहरांचे कमाल तपमान तीस अंशाच्या पुढे सरकले आहे. राज्यात भिरा येथे सर्वाधिक ३८.५इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली. यापाठोपाठ चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांनाही उन्हाचा जोरदार तडाखा बसत आहे. भिरानंतर चंद्रपूरमध्ये ३८.४ इतके कमाल तपमान नोंदविले गेले. एकूणच विदर्भात उष्मा वाढला आहे.

नाशिकमध्येही उन्हाची तीव्रता वाढत असून वा-याचा वेग मंदावलेला राहिला तर कमाल तपामानाचा पारा अधिक वर सरकण्याची शक्यता आहे. एकूणच कडाक्याच्या थंडीनंतर आता नाशिककरांना उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करावा लागणार आहे. हवामान बदल आणि उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. नागरिकांनी पाणी भरपूर पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत; मात्र उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड फळे, फ्रिजमधील पाणी, आईस्क्रीमचा होणारा मोह तुर्तास टाळणे आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे आहेत. थंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर केलेला उत्तम असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघातNashikनाशिक