शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मौलाना मुफ्ती यांनी काढले पराभवाचे उट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:39 IST

केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप - सेना युतीला विरोध म्हणून मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी विजय मिळविला असून, त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख यांचा पराभव केला.

मालेगाव : केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप - सेना युतीला विरोध म्हणून मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी विजय मिळविला असून, त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख यांचा पराभव केला.मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी प्रथम अपक्ष व जनसुराज्य पक्षाकडून आमदार म्हणून काम केले आहे. गेल्यावेळी आघाडी नसल्याने राष्टÑवादीकडून उमेदवारी केलेल्या मौलाना मुफ्ती यांचा कॉँग्रेसच्या आमदार आसिफ शेख यांच्याकडून झालेल्या पराभवाचे त्यांनी उट्टे काढले.यंत्रमागधारकांसाठी सवलतीत वीज, बेरोजगारी, झोपडपट्टीवासीयांनी पक्की घरे देणे आणि यंत्रमागावर काम करणाऱ्या गरीब कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळवून देण्याच्या प्रश्नावर मौलाना मालेगाव मध्य मतदारसंघात मतदारांना सामोरे गेले. मतदारसंघातून आमदार आसिफ शेख यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप करण्यात आला. एमआयएमने औरंगाबाद नंतर मालेगावची जागा प्रतिष्ठेची केली होती. यात एमआयएमचे ओवेसी बंधूंनी शहरात तळ ठोकून झोकून दिले होते.आता कॉँग्रेस विरोधात पूर्वाश्रमीचे कॉँग्रेसचे असणारे युनुस इसा यांनी एमआयएमध्ये आपले प्रस्थ वाढवत मौलानांसाठी व्यूहरचना आखण्यासाठी सूत्रे आपल्या हातात घेत सर्व कॉँग्रेस विरोधकांनी एकत्र येत मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना विजय मिळवून दिला.महिलांच्या तीन तलाकच्या मुद्द्यावर राष्टÑवादीने घेतलेल्या भूमिकेने नाराज होऊन मौलानांनी राष्टÑवादीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एमआयएमचा हात धरून मिळविलेल्या उमेदवारीमुळे त्यांना यश मिळवून दिले. राज्यातील युती सरकार विरोधात मुस्लिमांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासठी म्हणून मतदारांनी त्यांना विधानसभेत पुन्हा पाठविले आहे.विजयाची तीन कारणे...1मालेगाव मध्य मतदारसंघात तळ ठोकून मतदारांशी संपर्क साधल्याने त्याचा चांगला फायदा झाला.2केंद्र व राज्य सरकारने मुस्लिमांबाबत घेतलेल्या निर्णयांविरोधात मतदारांशी मांडलेली भूमिका.3कॉँग्रेस विरोधकांची मोट बांधण्यात मिळालेले यश, राज्यासह केंद्रात एमआयएमने घेतलेली भूमिका. ओवेसी बंधूंनी घेतलेल्या प्रचारसभांमधून मांडलेली पक्षाची भूमिका.आसिफ शेख यांच्या पराभवाचे कारण...घराणेशाहीला कंटाळलेले मतदार तसेच कॉँग्रेस विरोधकांची मोट बांधण्यात विरोधक मौलानांच्या समर्थकांना आलेले यश ही त्यांच्या पराभवाची कारणे आहेत. प्रचारातील भावनात्मक मुद्दे प्रभावी ठरले.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते२ शेख आसिफ रशीद कॉँग्रेस 78723३ रऊफखान कादिरखान रिपाइं ए 66४ दीपाली विवेक वारूळे भाजप 1450६ बहबुद अब्दुल खालिक अपक्ष 59७ मोहंमद इमाईल जुम्मन अपक्ष 49८ अ. हमीद शेख हबीब अपक्ष 152९ सय्यद सलीम सय्यद अलीम अपक्ष 412१० अब्दुल वाहिद मोहंमद शरीफ अपक्ष 110११ इरफान मो. इसहाक अपक्ष 50१२ अब्दुल खालिक गुलाम मोहंमद अपक्ष 395१२ मोहंमद रिजवान मोहंमद अकबर अपक्ष 367१३ महेकौसर लुकमान मोहंमद अपक्ष 126

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019malegaon-central-acमालेगाव मध्यAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेसResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक