शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नाशिक जिल्ह्यात बेकायदेशीर दारूचा महापूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:42 IST

साधारणत: डिसेंबर महिन्यात नव वर्षाचा जल्लोष साजरा करतांना मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो,त्यासाठी देशी, विदेशी मद्य, बिअरचा सर्रास वापर केला जात असल्याने मद्यप्रेमींची मागणी लक्षात घेता, बनावट मद्य तयार करून ते विक्री करण्यात मद्य तस्करांचा कल असतो.

ठळक मुद्दे२३ हजार लिटर जप्त : उत्पादन शुल्कची कारवाई कारवाईत ३७ लाखाचा माल जप्त करण्यात आला

नाशिक : गुजरातसह दीव, दमण व सिल्व्हासा या केंद्र शासित राज्यांची सीमा लागून असल्याने मद्य तस्करांनी नाशिक जिल्ह्यात आपले हातपाय चांगलेच रोवल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. महिना भरात सुमारे २३ हजार लिटर देशी, विदेशी व बिअरचा बेकायदेशीर साठा पकडण्यात आला असून, एकूण कारवाईत ३७ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या या कारवाईचे यश पाहता, मद्यतस्करांची मोठी टोळी जिल्ह्यात कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे.साधारणत: डिसेंबर महिन्यात नव वर्षाचा जल्लोष साजरा करतांना मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो,त्यासाठी देशी, विदेशी मद्य, बिअरचा सर्रास वापर केला जात असल्याने मद्यप्रेमींची मागणी लक्षात घेता, बनावट मद्य तयार करून ते विक्री करण्यात मद्य तस्करांचा कल असतो. नाशिकपासून जवळच दीव, दमण, सिल्व्हासा ही केंद्रे शासीत राज्ये असून, याठिकाणी निर्मित होणा-या मद्याची किंमत कमी तसेच त्यावर कोणतेही शुल्क नसल्याने निम्म्याहून अधिक कमी किंमतीत मद्याची विक्री केली जाते. विशेष म्हणजे या ठिकाणी मद्याची खुली विक्री होत असल्यामुळे कितीही मद्य खरेदी करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. नेमका त्याचाच फायदा मद्यतस्करांकडून घेतला जात आहे. लहान, मोठ्या वाहनातुन चोरी, छुप्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दीव, दमण निर्मित दारू आणली जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात १८९ ठिकाणी केलेल्या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०४ लिटर बिअर, एक हजार लिटर विदेशी मद्य, १३०० लिटर हातभट्टीची दारू, १६०० लिटर देशी दारू, ४६० लिटर ताडी व देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे १८४५९ लिटर रसायन जप्त केले आहे. दारूची वाहतुक करणारे १२ वाहनेही ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ३७ लाख, ५९ हजार रूपयांचा मुद्देमाल या कारवाईत सापडला आहे. ११३ मद्यतस्करांना अटक करण्यात आली आहे. सन २०१६ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईपेक्षा यंदा दुप्पट कारवाई करण्यात आली असून, याचाच अर्थ मद्यतस्करांची मोठी टोळी जिल्ह्यात कार्यरत झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्याच्या सिमेवरच त्यांचे अड्डे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीNashikनाशिक