शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

 जमावाकडून दगडफेक : विल्होळी गावाच्या शिवारात महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:17 IST

विल्होळी गावातील कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतल्याने मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. अपघातानंतर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात येताच संतप्त गावक-यांच्या जमावाने कंटेनरला लक्ष्य केले.

ठळक मुद्देकंटेनरवर दगफे कर करुन संतापाला वाट मोकळी वाहनचालक मद्याच्या नशेत वाहतुक करीत असल्यामुळे अपघातांना निमंत्रण

नाशिक : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत विल्होळी गावाच्या शिवारात महामार्गावर पादचारी तरूण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच गावातील मोठा जमाव महामार्गावर जमला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त वाहनावर दगडफेक केली.याबाबत नाशिक तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी, विल्होळी गावाजवळ भीमा लक्ष्मण आचारी (३५, रा.कोळीवाडा) यांना नाशिकवरून मुंबईकडे भरधाव जाणारा कंटेनरने (एम एच १५ई.जी७९७७) जोरदार धडक दिली. या धडकेत आचारी हे कंटेनरच्या पाठीमागील चाकांखाली सापडून जागीच ठार झाले. घटनेची माहिती समजताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विल्होळी गावातील कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतल्याने मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. अपघातानंतर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात येताच संतप्त गावक-यांच्या जमावाने कंटेनरला लक्ष्य केले. कंटेनरवर दगफे कर करुन संतापाला वाट मोकळी करुन दिली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनरचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार विश्वास देशमुक करीत आहेत.विल्होळी, वाडीव-हे परिसरात महामार्गावर सातत्याने होणा-या अपघातांच्या घटनांमुळे नाहक जीव गमवावा लागत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या महामार्गावर भरधाव वेगाने वाहने धावत असून रात्रीच्या सुमारास गावांच्या जोड रस्त्यांकडेही वाहनचालक दुर्लक्ष करत असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. महामार्गा प्राधिकरण व प्रादेशिक परिवहन विभागाने महामार्गांवर वाहनचालकांची तपासणी मोहिम राबविण्याची मागणी होत आहे. बहुतांश वाहनचालक मद्याच्या नशेत बेभानपणे वाहतुक करीत असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच महामर्गालगतच्या गावांच्या जोडरस्त्यांच्या प्रारंभी दर्शनी भागात मोठ्या अकााराचे सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारण्याची गरज आहे.

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघातNashikनाशिक