शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

लग्नसराई, सुट्ट्यांमुळे मतदानाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:52 AM

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. त्यातच सिडको - सातपूर पट्ट्यातील उत्तर भारतीयदेखील मूळ गावी मतदानासाठी जात असल्याने हीसुद्धा राजकीय पक्षांना अडचणीत आणणारी बाब ठरली आहे.अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. तसा प्रत्येक पक्षाच्या विचाराला बांधील मतदार वर्ग ठिकठिकाणी असतोच. परंतु मतदान करून घेणे हे फार मोठे आव्हानात्मक काम असते. त्यामुळेच अनेकदा उमेदवारांना मतदारांसाठी गाड्यांची सोय करण्यासारखे अनुचित प्रकारदेखील करावे लागतात. हक्काचे मतदान सुटू नये हा त्यामागचा उद्देश असतो. यंदा ऐन एप्रिल महिन्यात निवडणूक होत असून, अनेक कारणांमुळे हक्काचे मतदान कसे होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मध्यंतरी पाऊस पडला असला तरी तत्पूर्वी तापमान चाळीस अंशांपर्यंत गेले होते. नाशिक शहरातही अशा कडक उन्हाच्या वेळी रहदारीचे रस्ते ओस पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात मतदारांना मतदानासाठी घराबाहेर आणण्यासाठी प्रवृत्त करणे हे मोठे आव्हान ठरले आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा होत असतात. परीक्षा संपल्यानंतर पालक मुलांना घेऊन बाहेर गावी निघून जातात. त्यामुळे हक्काचा मतदार बाहेर गेला तर मतदान करून घेणेदेखील अडचणीचे ठरणार आहे.सर्वाधिक चिंतेचा विषय लग्न सोहळ्यांचा आहे. पुढील आठवड्यात तसेच २९ एप्रिल रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशीदेखील लग्नाची तिथी असल्याने अनेक नागरिक त्यात व्यस्त असतील तसेच अन्यत्र लग्न सोहळ्यासाठी गेलेल्यांमुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता असून, ही बाबदेखील अडचणीची ठरणार असून, संबंधिताना मतदानासाठी कसे प्रवृत्त करता येईल हा अडचणीचा भाग ठरला आहे.उत्तर भारतीयांची मनधरणीउत्तर भारतातदेखील अनेक टप्प्यात मतदान होत असून, अशावेळी नाशिक शहरातील सिडको-सातपूर भागातील विशेषत: अंबड लिंकरोड, अशोकनगर, शिवाजीनगर, कामगारनगर अशा अनेक भागांत असलेल्या उत्तर भारतीयदेखील मूळ गावी गेले आहेत किंवा जात आहेत तर काही जण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतरदेखील सुटीत गावी जातात. त्याचादेखील मतदानाला फटका बसण्याची शक्यता असून, अशावेळी त्यांना मतदान झाल्यानंतर गावी जाण्यासाठी कसे प्रवृत्त करता येईल याविषयीदेखील राजकीय पक्षांची चाचपणी सुरू आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहे. पुढील आठवड्यात २३ तसेच २६ एप्रिल रोजी लग्नाची तिथी आहे. तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजीदेखील लग्नाची तिथी आहे. त्याचा मतदानाला फटका बसू शकतो. अर्थात, मतदान करणे हे काम प्राधान्याने केले पाहिजे.- नरेंद्र धारणे गुरुजी, पंचवटी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक