नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीनंतर शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया अतिरिक्त दहा जुड्यांच्या अनधिकृत व्यवहारावर अखेर निर्बंध आले असून उपनिबंधकांनी याप्रकरणी बाजार समितीला असे प्रकार रोखण्याचे आदेश दिले असून, सदर प्रकार न थांबल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. भाजीपाला विक्रीनंतर प्रत्येक वक्कलवर आडते-व्यापारी १० जुड्या अतिरिक्त घेत होते. याप्रकाराला शेतकरी संघटनेकडून सातत्याने विरोध केला जात होता. काही दिवस ही पद्धत बंद करण्यात आली होती. परंतु आडतदार व व्यापाऱ्यांकडून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली.याबाबत शेतकºयांची नाराजी व तक्रारींची दखल घेत शिवाजीराव कोठुळे, भाऊसाहेब गडाख व परिसरातील गावांमधील शेतकºयांनी याबाबत उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तक्रार दाखल करून आंदोलनाचा इशारा दिलाहोता. या तक्रारीचीदखल घेत उपनिबंधक सहकारी व पणन संस्था यांनी सदर दहा अतिरिक्त जुड्या घेण्याची पद्धत बंद करण्याचे बाजार समितीला कळविले आहे़ तसेच ही पद्धत बंद केली नाही तर महाराष्ट्र कृषी उत्पन्नाची खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मधील कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:37 IST
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीनंतर शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया अतिरिक्त दहा जुड्यांच्या अनधिकृत व्यवहारावर अखेर निर्बंध आले असून उपनिबंधकांनी याप्रकरणी बाजार समितीला असे प्रकार रोखण्याचे आदेश दिले असून, सदर प्रकार न थांबल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़
बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत अखेर रद्द
ठळक मुद्देलढ्याला यश : उपनिबंधकांकडून दखल