शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:13 IST

भाजपची कोंडी करणार : ‘ओबीसी’तून आरक्षण देण्यात सरकारला अपयश

सुयोग जोशी

नाशिक : राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही. समाजाची फसवणूक केली. आरक्षणाबाबत अन्याय केला. याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आता लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात मराठा समाजाचे ४५० हून अधिक अपक्ष उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे आंदोलक नाना बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भाजपची निवडणुकीत कोंडी करणार असल्याचेही बच्छाव म्हणाले.

बहुतांशी मराठा मतदार मराठा उमेदवारांना मतदान करणार, असा ठाम विश्वास सकल मराठा समाजाने व्यक्त केला आहे; तसेच मराठ्यांच्या जीवावर राजकीय खुर्च्या मिळवून त्यांचे ओबीसीतील आरक्षण मिळवून देण्यासाठी गप्प बसलेले आमदार, खासदार यांना मराठा समाज आता दारातही उभे करणार नाही, त्याचे नियोजन आम्ही समाजात करतो आहे. याबद्दल अर्ज भरण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. मराठा समाजाचे उमेदवार निवडणूक रिंगणात येणार म्हणून नाशिकची लोकसभा निवडणूकदेखील रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

बैठकीत घेणार निर्णयनाशिक शहरातील ५० वैद्यकीय व्यावसायिक येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील. मराठवाड्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले २०० हून अधिक नागरिकदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. यावेळीही विविध कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. किमान ४५० जण उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा अंदाज बच्छाव यांनी व्यक्त केला.

सरकारने मनोज जरांगे-पाटील यांची ‘एसआयटी’ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सत्तेत बसणाऱ्या मराठा आमदार, खासदारांचे अपयश आहे, मराठयांची मते लाटून समाजाला फसवणाऱ्यांना मराठा समाज कधीही उभे करणार नाही, त्यासाठीच हे नियोजन आहे. मराठ्यांना मुंबईत दिलेले आश्वासन विसरणाऱ्या, तसेच समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारला त्यांची जागा समाज दाखवेल.- करण गायकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चाइन्फो

मुंबई आंदोलनात सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना वाशी येथे दिले होते. त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सातत्याने विविध आश्वासने देऊन देखील सरकारतर्फे प्रत्यक्षात काहीही कृती करण्यात आलेली नाही. त्याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये दिसतील.- नाना बच्छाव, मराठा समाजाचे आंदोलक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlok sabhaलोकसभा