शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:13 IST

भाजपची कोंडी करणार : ‘ओबीसी’तून आरक्षण देण्यात सरकारला अपयश

सुयोग जोशी

नाशिक : राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही. समाजाची फसवणूक केली. आरक्षणाबाबत अन्याय केला. याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आता लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात मराठा समाजाचे ४५० हून अधिक अपक्ष उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे आंदोलक नाना बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भाजपची निवडणुकीत कोंडी करणार असल्याचेही बच्छाव म्हणाले.

बहुतांशी मराठा मतदार मराठा उमेदवारांना मतदान करणार, असा ठाम विश्वास सकल मराठा समाजाने व्यक्त केला आहे; तसेच मराठ्यांच्या जीवावर राजकीय खुर्च्या मिळवून त्यांचे ओबीसीतील आरक्षण मिळवून देण्यासाठी गप्प बसलेले आमदार, खासदार यांना मराठा समाज आता दारातही उभे करणार नाही, त्याचे नियोजन आम्ही समाजात करतो आहे. याबद्दल अर्ज भरण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. मराठा समाजाचे उमेदवार निवडणूक रिंगणात येणार म्हणून नाशिकची लोकसभा निवडणूकदेखील रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

बैठकीत घेणार निर्णयनाशिक शहरातील ५० वैद्यकीय व्यावसायिक येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील. मराठवाड्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले २०० हून अधिक नागरिकदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. यावेळीही विविध कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. किमान ४५० जण उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा अंदाज बच्छाव यांनी व्यक्त केला.

सरकारने मनोज जरांगे-पाटील यांची ‘एसआयटी’ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सत्तेत बसणाऱ्या मराठा आमदार, खासदारांचे अपयश आहे, मराठयांची मते लाटून समाजाला फसवणाऱ्यांना मराठा समाज कधीही उभे करणार नाही, त्यासाठीच हे नियोजन आहे. मराठ्यांना मुंबईत दिलेले आश्वासन विसरणाऱ्या, तसेच समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारला त्यांची जागा समाज दाखवेल.- करण गायकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चाइन्फो

मुंबई आंदोलनात सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना वाशी येथे दिले होते. त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सातत्याने विविध आश्वासने देऊन देखील सरकारतर्फे प्रत्यक्षात काहीही कृती करण्यात आलेली नाही. त्याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये दिसतील.- नाना बच्छाव, मराठा समाजाचे आंदोलक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlok sabhaलोकसभा