मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी
By Admin | Updated: September 23, 2016 00:58 IST2016-09-23T00:56:20+5:302016-09-23T00:58:01+5:30
जिल्ह्यात नियोजन : बैठकीत समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती; मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन

मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी
नाशिक : येथे शनिवारी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ यानिमित्त ठिकठिकाणी बैठका घेण्यात
आल्या़
येवल्यात नियोजनावर भर
लोणारी, वंजारी, गुजराथी आणि मुखेड येथील तेली समाजाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. येथील सरदार वल्लभभाई पटेल ग्रुपने आपला पाठिंबा व्यक्त केला असून, पाठिंबा असल्याचे पत्र अॅड. माणिकराव शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
पत्रकावर उद्योगपती सुशील गुजराथी, अनिरु द्ध पटेल, डॉ. राजेश पटेल, माजी नगराध्यक्ष नीलेश पटेल, शैलेश गुजराथी, नितीन पटेल, सुजोत पटेल, प्रणव पटेल, प्रज्वल पटेल, हरीश पटेल, मनोज गुजराथी, श्रीपाद पटेल, उमेश पटेल, रुपेश पटेल, विकास पटेल, मनीष पटेल, राम पटेल, नचिकेत पटेल, गजेंद्र पटेल, परेश पटेल, तरंग पटेल, गौरव पटेल, अंकुश पटेल, अभिजित पटेल, मयूर पटेल, प्रीतम गुजराथी, राजेश चौधरी, आनंद देसाई, सुयोग पारेख आदिंसह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तालुक्याच्या लोणारी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यात मराठा समाजाच्या क्र ांती मोर्चास पाठिंबा देण्यात आला आहे. पिंपळखुटे, लौकी, वळदगाव, शेवगे, येवला येथील लोणारी समाजबांधवाची बैठक येवल्यात संपन्न झाली. कोपर्डी घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी होते. बैठकीस अॅड. भुले, राजेंद्र लोणारी, सागर लोणारी, दीपक लोणारी, रुपेश लोणारी, राहुल लोणारी, उपसरपंच उमेश आजगे, गोरख बुले, भाऊलाल कानडे, दत्तू कानडे, भास्कर बुले, मुरलीधर इंगळे, राजू इंगळे, भास्कर उंडे, सुभाष उंडे, मधुकर उंडे, निवृत्ती उंडे, धोंडू उंडे, नाना उंडे, बाबूराव कुऱ्हे, डॉ. सतीश कुऱ्हे, रेखा आढाव, सुवर्णा कानडे, लता कानडे, गणेश कोल्हारकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ममदापूर येथे नियोजन बैठक
राजापूर येथे मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न झाली. कोपर्डी येथील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तसेच समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आरक्षण मिळावे इत्यादि मागण्या मान्य करण्यासाठी आपण सगळ्या समाजबांधव व शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे एक दिवस बंद ठेवून २४ तारखेला नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती संभाजीराजे पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय बनकर, अॅड. शाहुराजे शिंदे, बापूराव काळे, भागवत सोनवणे, झुंझार देशमुख, संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते ममदापूर येथे आले होते़ बबन वाघ, समाधान चव्हाण, दिनेश आव्हाड, पोपट आव्हाड, शंकर अलगट,
संजय वाघ, दिनकर वाघ, रमेश वाघ, संतोष चव्हाण, अनिल चव्हाण, रवींद्र दाणे, शरद वाघ, भाऊसाहेब गायकवाड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
वंजारी समाजाची मदत
राजापूर येथील वंजारी समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चासाठी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. समाजाच्या वतीने सगळ्या प्रकारची मदत करण्यात येईल व सहकुटुंब सामील होऊ, अशी प्रतिक्रि या दिनेश आव्हाड यांनी दिली आहे. (लोकमत चमू)