सटाण्यात मराठा समाजाचा मेळावा
By Admin | Updated: September 8, 2016 00:47 IST2016-09-08T00:47:15+5:302016-09-08T00:47:44+5:30
सटाण्यात मराठा समाजाचा मेळावा

सटाण्यात मराठा समाजाचा मेळावा
सटाणा : समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी मराठा समाज नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे कायद्याचा दुरुपयोग अराजकता माजवत आहे. असे कायदे रद्द करण्यासाठी समाजाने संघटित होऊन येत्या २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित मूक मोर्चात बागलाणच्या समाजबांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी केले.
या मोर्चाच्या नियोजनासाठी येथील आनंद लोन्स येथे आज मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना रामचंद्रबापू पाटील बोलत होते. सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्रात सत्तावीस टक्के समाज हा मराठा समाज आहे. असे असताना काही समाज विघातक मंडळी कायद्याचा दुरुपयोग करून अत्याचार करत आहे. यामुळे समाजातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.ती अबाधित राखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा व समाजाला आरक्षण जाहीर करावे यासाठी मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी करण गायकर, मविप्रचे उपसभापती नानाजी दळवी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, अनिल पाटील, डॉ.प्रशांत पाटील, शैलेश सूर्यवंशी, ज.ल. पाटील, नगरसेवक काका रौंदळ, कुबेर जाधव, भाऊसाहेब अहिरे, कृष्णा भामरे, खेमराज कोर यांची भाषणे झाली.
मेळाव्यास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राघोनाना अहिरे, अरविंद सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख शरद शेवाळे, वसंत भामरे, डॉ.भास्कर भामरे, नंदू सोनवणे, प्रकाश निकम, भाऊसाहेब राजे, मिलिंद शेवाळे, जयप्रकाश सोनवणे, सुहास पवार, पंकज सोनवणे, राहुल सोनवणे, योगेश सोनवणे, विजय सोनवणे यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)