शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

तुकाराम मुंढे यांनी नाशिक मनपात सुरू केलेल्या अनेक सेवा थंड

By संजय पाठक | Updated: August 23, 2019 16:20 IST

नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसाद घटला आहे. तर महापालिकेत नागरीकांना येऊ लागु नये यासाठी असलेल्या सेवांचा प्रतिसाद घटल्याने राजीव गांधी भवन आणि विभागीय कार्यालयात राबता वाढु लागला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन तक्रारींचा निपटारा आॅफलाईनकामांसाठी पुन्हा मनपा कार्यालयात घालाव्या लागतात चकरा

नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसाद घटला आहे. तर महापालिकेत नागरीकांना येऊ लागु नये यासाठी असलेल्या सेवांचा प्रतिसाद घटल्याने राजीव गांधी भवन आणि विभागीय कार्यालयात राबता वाढु लागला आहे.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांची बदली झाली. या कालावधीत त्याची कारकिर्द वादग्रस्त ठरली असली तरी प्रशासकिय सुधारणा पुरेपूर केल्या होत्या. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी इ कनेक्ट अ‍ॅप सुरू केल्यानंतर त्याची दखल न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आॅटो जनरेटेड मेमो चा प्रकार सुरू केला तर खाते प्रमुखांना आयुक्तांनी थेट नोटिसा देताना अनेकांना निलंबीतही केले होते. त्यामुळे महापालिकेचे इ कनेक्ट अ‍ॅप अत्यंत प्रभावी ठरले होते. आयुक्त स्वत: त्याचा आढावा घेऊन कारवाई करीत असल्याने अधिका-यांवर आॅनलाईन अ‍ॅपची मोठी धास्ती निर्माण झाली होती.

नागरीकांना त्यांच्या सेवा आॅनलाईन मिळाव्यात किंवा तक्रारी देखील आॅनलाईनच करता याव्यात आणि त्यांना कोणत्याही कामासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे लागू नये यासाठी त्यांनी तंत्रज्ञानावर भर दिला होता. ५५ प्रकारच्या परवानग्या आणि दाखल्यासाठी अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली होती. घंटागाडीचे ट्रॅकींग आणि ती येण्याचे अलर्ट देखील मोबाईलवर येतात.

दरम्यान, आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर साºया सेवा थंडावल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी केल्या तरी त्यांचे निराकरण न करताच बंद करण्याची सोय तर आहेच परंतु अ‍ॅपवरून घरपट्टी सुध्दा भरण्यास अडथळे येतात. आयटी विभाग प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्या प्रशांत मगर यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर महपाालिकेला पात्र अधिकारी देखील सापडलेला नाही. तक्रारींसाठी महापालिकांना पुन्हा मुख्यालय आणि विभागीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

जन्म मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेत सर्वाधिक नागरीकांना यावे लागते. ते अ‍ॅपवर देण्याच्या पलिकडे जाऊन ईमेलने पाठविण्याचा देखील त्यांचा विचार होता. त्यानंतर अशा सेवांच्या केवळ चर्चाच झाल्या परंतु आॅनलाईनचा प्रभाव अत्यंत कमी झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे