शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

तुकाराम मुंढे यांनी नाशिक मनपात सुरू केलेल्या अनेक सेवा थंड

By संजय पाठक | Updated: August 23, 2019 16:20 IST

नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसाद घटला आहे. तर महापालिकेत नागरीकांना येऊ लागु नये यासाठी असलेल्या सेवांचा प्रतिसाद घटल्याने राजीव गांधी भवन आणि विभागीय कार्यालयात राबता वाढु लागला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन तक्रारींचा निपटारा आॅफलाईनकामांसाठी पुन्हा मनपा कार्यालयात घालाव्या लागतात चकरा

नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसाद घटला आहे. तर महापालिकेत नागरीकांना येऊ लागु नये यासाठी असलेल्या सेवांचा प्रतिसाद घटल्याने राजीव गांधी भवन आणि विभागीय कार्यालयात राबता वाढु लागला आहे.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांची बदली झाली. या कालावधीत त्याची कारकिर्द वादग्रस्त ठरली असली तरी प्रशासकिय सुधारणा पुरेपूर केल्या होत्या. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी इ कनेक्ट अ‍ॅप सुरू केल्यानंतर त्याची दखल न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आॅटो जनरेटेड मेमो चा प्रकार सुरू केला तर खाते प्रमुखांना आयुक्तांनी थेट नोटिसा देताना अनेकांना निलंबीतही केले होते. त्यामुळे महापालिकेचे इ कनेक्ट अ‍ॅप अत्यंत प्रभावी ठरले होते. आयुक्त स्वत: त्याचा आढावा घेऊन कारवाई करीत असल्याने अधिका-यांवर आॅनलाईन अ‍ॅपची मोठी धास्ती निर्माण झाली होती.

नागरीकांना त्यांच्या सेवा आॅनलाईन मिळाव्यात किंवा तक्रारी देखील आॅनलाईनच करता याव्यात आणि त्यांना कोणत्याही कामासाठी महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे लागू नये यासाठी त्यांनी तंत्रज्ञानावर भर दिला होता. ५५ प्रकारच्या परवानग्या आणि दाखल्यासाठी अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली होती. घंटागाडीचे ट्रॅकींग आणि ती येण्याचे अलर्ट देखील मोबाईलवर येतात.

दरम्यान, आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर साºया सेवा थंडावल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी केल्या तरी त्यांचे निराकरण न करताच बंद करण्याची सोय तर आहेच परंतु अ‍ॅपवरून घरपट्टी सुध्दा भरण्यास अडथळे येतात. आयटी विभाग प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्या प्रशांत मगर यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर महपाालिकेला पात्र अधिकारी देखील सापडलेला नाही. तक्रारींसाठी महापालिकांना पुन्हा मुख्यालय आणि विभागीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

जन्म मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेत सर्वाधिक नागरीकांना यावे लागते. ते अ‍ॅपवर देण्याच्या पलिकडे जाऊन ईमेलने पाठविण्याचा देखील त्यांचा विचार होता. त्यानंतर अशा सेवांच्या केवळ चर्चाच झाल्या परंतु आॅनलाईनचा प्रभाव अत्यंत कमी झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे