शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

बस कंपनीवरून मनपात ‘खडखड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:29 IST

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी शनिवारी (दि.१९) महासभेत जाब विचारत गोंधळ घातला. राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी थेट पीठासनावर जाऊन राजदंडाला हात घातला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सभेचे कामकाज गुंडाळून सभा संपवली.

ठळक मुद्देचर्चा परिवहनची, ठराव केला कंपनीचा शेलार आक्रमक; महापौरांनी गुंडाळले कामकाज

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी शनिवारी (दि.१९) महासभेत जाब विचारत गोंधळ घातला. राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी थेट पीठासनावर जाऊन राजदंडाला हात घातला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सभेचे कामकाज गुंडाळून सभा संपवली. या सभेनंतर विरोधकांनी प्रतिसभा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी केल्याने गजानन शेलार आणि त्यांच्यात खडाजंगी झाली आणि ही प्रतिसभाही गुंडाळली गेली.महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रस्तावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापन करावी तीच कायद्यात तरतूद आहे, असे त्यावेळी नमूद केले आणि महापौर रंजना भानसी यांनी तशी घोषणाही केली होती. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेने बससेवेलाच विरोध केला होता. परंतु यांसदर्भातील कोणतीही नोंद त्या सभेत घेण्यात आली नाही. सप्टेंबर महिन्याचे इतिवृत्त शनिवारी (दि.१९) महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होेते. दुपारी बारा वाजता सभेचे कामकाज सुरू होताच राष्टÑवादीचे गजानन शेलार यांनी इतिवृत्त मंजुरीच्या विषयाला आक्षेप घेतला आणि आपण दिलेले पत्र वाचून दाखवण्यास सांगितले. महापौरांनी त्यांना दाद न देताच खाली बसण्यास सांगितले. यामुळे शेलार अधीकच आक्रमक झाले आणि त्यांनी अशाप्रकारचे काम चालणार नाही, असे सांगत पीठासनावर धाव घेतल्याने गोंधळ सुरू झाला.महापौर रंजना भानसी यांनी त्यांना पीठासनावरून खाली जाण्यास सांगितले, परंतु ते खाली तर उतरले नाहीत उलट राजदंडालाच हात घातला आणि तो पळवण्याची तयारी केल्याने महापौरांचा नाईक धावला आणि राजदंड पकडला. गदारोळ सुरू झाल्याने महापौरांनी तातडीने सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा गुंडाळली.तीन महत्त्वपूर्ण विषयांवर स्वतंत्र चर्चामहापालिकेच्या मिळकती भाड्याने देण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देणे, मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्यासाठी इरादा जाहीर करणे तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये अक्षयपात्र योजनेची अंमलबजावणी करणे हे तीन विषय वगळता महापौर रंजना भानसी यांनी सर्व विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. या विषयांवर स्वतंत्र महासभा घेण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे आता या विषयांसाठी पुढील महासभेची वाट पहावी लागणार आहे.सेना ‘रामायण’वर, महापौर लग्नाला!महापालिकेच्या महासभेत झालेल्या गदारोळानंतर शिवसेनेचे सर्व नगरसेवक विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली महापौरांना भेटण्यासाठी गेले आणि कामकाज योग्य पद्धतीने होत नाही, तसेच परिवहन समितीचा ठराव झाला असताना बस कंपनीचा ठराव प्रशासनाकडे का पाठविण्यात आला, याची चौकशी करण्यासाठी गेले. परंतु महापौर आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी गायब होते. एका लग्न सोहळ्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस