शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

मनमाडचा पाणीप्रश्न बिकट

By admin | Updated: December 26, 2015 00:18 IST

नरेंद्र दराडे : पिण्याच्या पाण्यासाठी पालखेडचे तत्काळ आवर्तन द्या

येवला : पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन मजूर आहे, ते द्यायचे आहेच मग जिल्हा प्रशासन उशीर का करत आहे. पाणी योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठला असून, यामुळे मनमाडला नागरिकांचे सर्वाधिक हाल सुरू आहेत. अनेकांना तर पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पालखेडच्या भरवशावर असलेल्या गावांतील चित्रही कठीण आहे. त्यामुळे पालखेडचे आवर्तन त्वरित देण्याची मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी केली आहे.सिंचनाला एक आवर्तन देणे गरजेचे होते, त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली; पण जलसंपदा विभागाने याची दखल घेतली नसल्याने एका पाण्याअभावी रब्बीचे पीक हातचे गेले असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाने लेखी पत्र देत पाणी सिंचनाला देणार नसल्याचे सांगत पिण्यासाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. मग आता प्यायला पाणी शिल्लक राहिले नसताना आवर्तन देण्यास उशीर का केला जात आहे, असा सवाल दराडे यांनी केला आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलवाचा गाळ उघडा पडला आहे. त्यामुळे २० दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. येवल्यालादेखील आवर्तन लांबल्याने सहा दिवसाआड पाणीपुरवठा पालिकेने सुरू केला असून, येवला ३८ गाव योजनेच्या साठवण तलावाने तळ गाठल्याने पाणीकपात सुरू झाली आहे. आवर्तन लांबवले जात असल्याने गावोगावच्या पाणी योजना तसेच वाड्यावस्त्यांवरदेखील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. परिणामी शहरात तसेच काही गावांमध्येही नागरिक विकत पाणी घेऊन गरज भागवत आहे. जनावरांनादेखील प्यायला पाण्याचा अभाव जाणवत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी मनमाड येथील बैठकीत डिसेंबरच्या शेवटापर्यंत प्यायला आवर्तन देतो असे सांगितले; पण अजून कुठलीच हालचाल नसल्याने नागरिकांचे पाण्याअभावी हाल सुरू आहेत. गावोगावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न आणि वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे येवल्यातील गावोगावचे पिण्यासाठी आरक्षित असलेले सर्व २६ बंधारेदेखील या आवर्तनातून भरून द्यावेत म्हणजे ग्रामीण भागातील टंचाई दूर होण्यास मदत होणार असून, आता सर्वत्र पाणी संपल्याने तत्काळ आवर्तन सोडावे, यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. (वार्ताहर)