शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

मनमाडला कडकडीत ‘बंद’!

By admin | Updated: August 21, 2016 00:18 IST

तालुक्यासह विविध मागण्या : बचाव समिती, व्यापारी महासंघाचा पुढाकार

 मनमाड : जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा तसेच शहराच्या गंभीर पाणीप्रश्नासह इतर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने येथील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या आजच्या पाचव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने अखेर मनमाड शहर व्यापारी महासंघाच्या वतीने मनमाड बंदची हाक दिली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मनमाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.नागरी मूलभूत सुविधांअभावी शहराची दैनावस्था झाली आहे. साक्री तालुक्यातील तहसील कार्यालयाचे विभाजन करून पिंपळनेर येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, तोपर्यंत मनमाड येथे अपर तहसील कार्यालय सुरू करावे, शहरासाठी कायमस्वरूपीची ग्रॅव्हीटीची पाणी योजना सुरू करावी, पालिकेच्या कामाचे फेर आॅडिट करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी क्रांतिदिनी बचाव समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या नंतर १० ते १४ आॅगस्टदरम्यान शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आल्यानंतरही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने अखेर १६ आॅगस्टपासून समितीचे कार्यकर्ते भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, पोपटलाल बेदमुथा, किसनलाल बंब, कैलास शिंंदे, महेंद्र गरुड हे आमरण उपोेषणाला बसले.पाचव्या दिवशीही उपोषण सुरू राहिल्याने असंतोष वाढत गेल्याने व्यापारी महासंघाने शहराध्यक्ष राजाभाऊ पारीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनमाड बंदचा निर्णय घेतला. आज सकाळी एकात्मता चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. गांधी पुतळा, सराफ बाजार, शिवाजी चौक, नेहरू भवन, तेली गल्लीमार्गे निघालेल्या फेरीचा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. या ठिकाणी उपोषणकर्ते पोपटलाल बेदमुथा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका विशद केली. शहरात खासगी आस्थापना, दुकाने बंद असल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. बंदमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले होते. (वार्ताहर)