शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वकिलवाडीत आंब्याचे झाड कोसळले; पाच दुचाकींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 16:47 IST

झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देअग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली

नाशिक : शहरातील अत्यंत गजबजलेल्या वकीलवाडी परिसरातील एका व्यापारी संकुलाच्या वाहनतळात असलेले आंब्याचे मोठे झाड सोमवारी (दि.१) दुपारच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणही व्यक्ती जखमी झाली नाही; मात्र वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकींचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले.वकिलवाडीमध्ये असलेल्या सारडा संकुल या व्यापारी संकुलाच्या वाहनतळात असलेले आंब्याचे मोठे झाड दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे उन्मळून पडले. यावेळी संकुलाच्या वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकी झाडांच्या फांद्यांखाली दाबल्या गेल्या. झाडाच्या काही फांद्या वर्दळीच्या रस्त्यावरही येऊन पडल्यामुळे वाहतुकही विस्कळीत झाली होती. नागरिकांनी तत्काळ अग्नीशमन दलाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. कोसळलेल्या वृक्षाच्या फांद्यांचा अडथळा पेट्रोलकटरच्या सहाय्याने जवानांनी कापून दूर केला. या दुर्घटनेत ॲक्सेस, ॲक्टीवा, अव्हेंजर यासांरख्या दुचाकींचे नुकसान झाले. दरम्यान, वादळवारा नसताना हिरवागार असलेला डेरेदार आम्रवृक्ष अचानकपणे कसा कोसळला? याविषयी परिसरात चर्चा रंगली होती. झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या उद्यान विभागाने याबाबत पाहणी करुन पंचनामा करण्याची मागणी होत आहे.-----

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघात