शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिवडेकरांच्या मागण्या समितीपुढे मांडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:38 IST

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांशी बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने शिवडे ग्रामस्थांनीही महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याबाबत लवकरच गावकºयांशी चर्चा करून निर्णय कळविण्याचे आश्वासन दिले. सुमारे दीड तास चालललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी सकारात्मकता दर्शविण्यात आल्याने यासंदर्भातील तिढा सुटण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देएकनाथ शिंदे : ‘समृद्धी’ला विरोध मावळल्याची चिन्हे; जमिनीच्या मोजणीबाबत निर्णय कळविणार

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांशी बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने शिवडे ग्रामस्थांनीही महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याबाबत लवकरच गावकºयांशी चर्चा करून निर्णय कळविण्याचे आश्वासन दिले. सुमारे दीड तास चालललेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी सकारात्मकता दर्शविण्यात आल्याने यासंदर्भातील तिढा सुटण्याची शक्यता बळावली आहे.मुंबई-नागपूर महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध दर्शवून शिवडे येथील शेतकºयांनी जमिनीची मोजणी करू देण्यासही नकार दिल्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे व त्यात अडचणी येत असल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांनी अनेक मार्गाने शिवडे ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश मिळत नव्हते. या सर्व पार्श्वभूमीवर सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी मध्यस्थी करून शिवडे ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. यावेळी शिवडे ग्रामस्थांनी शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु समृद्धीसाठी जमिनी गेल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या महामार्गात विहिरीही नष्ट होणार असून, त्यामुळे पंचक्रोशीत पाण्याची समस्या निर्माण होऊन शेतकरी उद्ध्वस्त होतील, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यावर शिंदे यांनी, शेतकºयांच्या अनुमतीशिवाय सरकार कोणाचीही जमीन घेणार नाही, परंतु ज्या-ज्या भागातून समृद्धी महामार्ग जाईल तेथील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले. शेतकºयांच्या काही मागण्या योग्य असून, सरकार सकारात्मकतेने त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल व काही मागण्यांबाबत उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असल्याचे सांगितले.सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने सरकार याप्रश्नी शेतकºयांना दिलासा देणार असेल तर लवकरच शिवडे गावात बैठक घेऊन संपूर्ण गावकºयांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येईल व त्यांनी अनुमती दिल्यास जागा मोजणीचा निर्णय अधिकाºयांना कळविण्यात येईल, असे आश्वासनही ग्रामस्थांकरवी देण्यात आले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, विठ्ठल सोनवणे यांच्यासह प्रकल्पबाधित सोमनाथ वाघ, विष्णू हरक, हरिभाऊ शेळके, संजय हरक, शरद हरक, परशराम हरक, नंदू शेळके, रमेश शेळके, संजय चव्हाणके, बाजीराव हरक आदी शेतकरी उपस्थित होते. समृद्धीला सेनेचा विरोध नाहीया बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा कधीही विरोध नव्हता, असा यू टर्न घेतला. शिवसेनेच्या नाशिक मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना समृद्धीबाधित शेतकºयांच्या पाठीशी उभी राहील अशी घोषणा केली होती, त्याची आठवण शिंदे यांना करून देण्यात आल्यावर ते म्हणाले, शिवसेनेने विकासाला कधीच विरोध केला नाही. शेतकºयांचा विरोध असेल तर शिवसेना विरोध करेल अशी आमची भूमिका होती. आता शेतकरी स्वखुशीने जागा देण्यास संमती देत असल्यामुळे विरोधाचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलट आपण स्वत: प्रत्येक शेतकºयाला भेटून त्यांची भूमिका समजून घेत असून, शेतकºयांना चांगला मोबदला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.