शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:56 AM

अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते.

पंचवटी : अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते. मनुष्यजन्म केवळ भक्ती करण्यासाठी मिळाल्याचे प्रतिपादन अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.पेठरोडवरील रामशेज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठातर्फे बुधवारी (दि.२२) समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी नरेंद्राचार्य यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी पुढे असे सांगितले की, सत्कर्म करून जास्तीत जास्त पुण्य या जन्मात मिळवावे. पापसुद्धा याच जन्मात फेडावे लागते ते दु:खाच्या स्वरूपात. जीवनात दु:ख निर्माण होणार नाही यासाठी दिवसातून किमान दहा मिनिटे मन एकाग्र करा. मनात दुसरा कोणताच विचार आणू नये. मनाला भक्तीचा व्यायाम द्यावा. असे केल्याने कोणत्याही देवाची माणसाला गरज पडणार नाही, तो स्वत:च स्वत:च्या समस्येवर मात करू शकतो. जास्त अपेक्षा हेच खरे दु:खाचे कारण आहे. दु:खाचे आणखी कारण सांगताना स्वामीजी म्हणाले की, आपण दिवसभरात जे निर्णय घेतो ते फार महत्त्वाचे आहे. निर्णय बिनचूक घेतल्यास दु:ख निर्माण होत नाही. त्यासाठी संयम मात्र महत्त्वाचा आहे. समयसुचकता अंगी असल्यास समस्या निर्माण होत नाही. दानाचे महत्त्व सांगताना त्यांनी समाजोपयोगी सेवेत भाविकांनी रक्तदान, अवयवदान, अन्नदान, श्रमदान यांपैकी कोणतेही दान करावे. समाजाच्या सेवेतदेखील गुरू सेवा आहे, तसे ते शेवटी म्हणाले. यावेळी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक