शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:16 IST

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देभाई वैद्य मालेगावी येवून मार्गदर्शन करीत असतसामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव करुन देत

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मालेगाव हे समाजवादी चळवळीचे एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे भाई वैद्य यांचे मालेगावात नेहमीच विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी येणे असायचे. परखड, स्पष्ट वक्ता असल्याने भार्इंना ऐकण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने जमत. राष्टÑसेवा दलाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम असो की, मुस्लिम युवकांचे शिबीरासाठी भाई वैद्य मालेगावी येवून मार्गदर्शन करीत असत. राष्टÑसेवा दलाची अमृत महोत्सवी कार्यक्रमांच्या बैठकीसाठी ते मालेगावी आले होते. ८७ वर्ष वयाची पर्वा न करता २०१६ मध्ये ते संपूर्ण महाराष्टÑ भर फिरून अमृत महोत्सवी कार्यक्रमांची तयारीत ते व्यक्त होते. येथील या. ना. जाधव विद्यालयात १९ र्मा २०१६ रोजी त्यांची मालेगावी शेवटची भेट संस्मरणीय ठरली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव करुन देत राष्टÑसेवा दलाची देशाला सद्यस्थितीत गरज असल्याचे सांगितले होते. मालेगावचे तत्कालीन लोकप्रतिनिधी निहाल अहमद यांचे समवेत ते महाराष्टÑ राज्याच्या मंत्रीमंडळात १९८० चे सुमारास एकत्रितपणे काम केले होते. निहालभाई रोजगार हमी मंत्री होते तर भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते. जनता पक्ष, समाजवादी पक्ष, राष्टÑसेवा दलाच्या कार्यक्रमांसाठी ते अनेकवेळा मालेगावी येवून मार्गदर्शन करून गेल्याची राष्टÑसेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी दिली. गुरूवर्य बोवादादा यांच्या जीवनावरील ‘ज्ञानतपस्वी’ विशेषांकाचे प्रकाशन भाई वैद्य यांचे हस्ते मालेगावी झाले होते. यावेळी डॉ. बळीराम हिरे, स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर, निवृत्ती कामगार आयुक्त के. डी. खरे, प्रा. रमाकांत वालवडकर, प्रा. सुभाष खरे, प्रसाद हिरे यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाल्याचे श्रीकांत वाघ यांनी सांगितले. भार्इंचे जसे मालेगावशी सामाजिक व राजकीय संबंध होते तसे त्यांचे कौटुंबिक संबंधही दृढ होते. त्यांची एकुलती एक कन्या डॉ. प्राची हिचा शुभविवाह मुळचे मालेगावचे आझाद चौकातील रहिवाशी व सध्या पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. प्रताप मनोहर रावळ यांचेशी झाला आहे. त्यामुळे त्यांचे मालेगावशी कायमचे नाते जुळले होते. मालेगावातील डॉ. सुगन बरंठ, दत्ता वडगे, अ‍ॅड. भास्कर तिवारी, संजय जोशी, कै. डॉ. नवलराय शहा, निहाल अहमद यांचेशी भार्इंचे नेहमीच संबंध राहिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी कार्यक्रमासाठी मालेगावी येण्यासाठी त्यांना आपण खास निमंत्रण देण्यासाठी गेल्याची आठवण दत्ता वडगे यांनी सांगितली.