शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला मालेगाव : भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:16 IST

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देभाई वैद्य मालेगावी येवून मार्गदर्शन करीत असतसामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव करुन देत

संगमेश्वर : दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे मालेगाव शहराशी सामाजिक तसेच कौटुंबिक ऋणानुबंध असल्याने समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. मालेगाव हे समाजवादी चळवळीचे एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे भाई वैद्य यांचे मालेगावात नेहमीच विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमांसाठी येणे असायचे. परखड, स्पष्ट वक्ता असल्याने भार्इंना ऐकण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने जमत. राष्टÑसेवा दलाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम असो की, मुस्लिम युवकांचे शिबीरासाठी भाई वैद्य मालेगावी येवून मार्गदर्शन करीत असत. राष्टÑसेवा दलाची अमृत महोत्सवी कार्यक्रमांच्या बैठकीसाठी ते मालेगावी आले होते. ८७ वर्ष वयाची पर्वा न करता २०१६ मध्ये ते संपूर्ण महाराष्टÑ भर फिरून अमृत महोत्सवी कार्यक्रमांची तयारीत ते व्यक्त होते. येथील या. ना. जाधव विद्यालयात १९ र्मा २०१६ रोजी त्यांची मालेगावी शेवटची भेट संस्मरणीय ठरली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव करुन देत राष्टÑसेवा दलाची देशाला सद्यस्थितीत गरज असल्याचे सांगितले होते. मालेगावचे तत्कालीन लोकप्रतिनिधी निहाल अहमद यांचे समवेत ते महाराष्टÑ राज्याच्या मंत्रीमंडळात १९८० चे सुमारास एकत्रितपणे काम केले होते. निहालभाई रोजगार हमी मंत्री होते तर भाई वैद्य गृहराज्यमंत्री होते. जनता पक्ष, समाजवादी पक्ष, राष्टÑसेवा दलाच्या कार्यक्रमांसाठी ते अनेकवेळा मालेगावी येवून मार्गदर्शन करून गेल्याची राष्टÑसेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी दिली. गुरूवर्य बोवादादा यांच्या जीवनावरील ‘ज्ञानतपस्वी’ विशेषांकाचे प्रकाशन भाई वैद्य यांचे हस्ते मालेगावी झाले होते. यावेळी डॉ. बळीराम हिरे, स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर, निवृत्ती कामगार आयुक्त के. डी. खरे, प्रा. रमाकांत वालवडकर, प्रा. सुभाष खरे, प्रसाद हिरे यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाल्याचे श्रीकांत वाघ यांनी सांगितले. भार्इंचे जसे मालेगावशी सामाजिक व राजकीय संबंध होते तसे त्यांचे कौटुंबिक संबंधही दृढ होते. त्यांची एकुलती एक कन्या डॉ. प्राची हिचा शुभविवाह मुळचे मालेगावचे आझाद चौकातील रहिवाशी व सध्या पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. प्रताप मनोहर रावळ यांचेशी झाला आहे. त्यामुळे त्यांचे मालेगावशी कायमचे नाते जुळले होते. मालेगावातील डॉ. सुगन बरंठ, दत्ता वडगे, अ‍ॅड. भास्कर तिवारी, संजय जोशी, कै. डॉ. नवलराय शहा, निहाल अहमद यांचेशी भार्इंचे नेहमीच संबंध राहिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी कार्यक्रमासाठी मालेगावी येण्यासाठी त्यांना आपण खास निमंत्रण देण्यासाठी गेल्याची आठवण दत्ता वडगे यांनी सांगितली.