शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

मालेगाव महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 12:45 AM

मालेगाव : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन दोन दशके उलटली आहेत तरीदेखील महापालिकेने शहरात वृक्ष गणना केली नसल्याची धक्कादायक बाब ...

ठळक मुद्देवृक्ष कर भरूनही नागरिक सावलीपासून वंचित : केवळ १७२ दुर्मीळ वृक्षांची नोंद

मालेगाव : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन दोन दशके उलटली आहेत तरीदेखील महापालिकेने शहरात वृक्ष गणना केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर पडला आहे. नागरिकांना वृक्ष कर भरूनही सावलीपासून वंचित राहावे लागत आहे. केवळ पन्नास वर्षांपुढील १७२ वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. सुमारे साडेसात लाख लोकवस्तीच्या शहरात झाडांची संख्या कमी असल्याने याचा थेट परिणाम पर्यावरणावर पडत आहे.महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ नुसार शहरात व्यक्तीमागे दोन वृक्ष असणे बंधनकारक आहे. त्यानुसार मालेगाव शहरात कमीत कमी ९ लाख वृक्षांची आवश्यकता आहे; मात्र महापालिकेने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाकडे सक्षम पाठ फिरवली आहे. वृक्ष लागवड, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शहर स्वच्छता, मोसम नदी सुशोभीकरण, एकेरी वाहतूकसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. शहरातील पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत एकदाही पर्यावरण स्थिती दर्शक अहवाल सादर केला नाही. कुठल्याही प्रकारची पाण्यावर प्रक्रिया न करता सर्रासपणे मोसम नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. अयोग्य पद्धतीने होणारा घनकचरा संकलन, अवजड वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वृक्ष लागवड व संवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे मालेगावी पर्यावरणाचा बोजवारा उडाला आहे. केंद्र व राज्य पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहराचा वार्षिक पर्यावरण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र या निर्देशांना महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जाते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पर्यावरण अहवालासाठी तरतूद करण्यात येते; मात्र वृक्ष लागवडीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.मनपाचे पर्यावरणाकडे दुर्लक्षनगरपालिका व महापालिका स्थापनेनंतरही शहरात एकदाही वृक्ष गणना झाली नाही. त्यामुळे शहरात किती वृक्ष आहेत याबाबत प्रशासनच अनभिज्ञ आहे. येथील तरुणाई व ग्रीन मालेगाव ड्राइव्ह व नैसर्गिकरीत्या जगलेली सुमारे १५ ते २० हजार झाडे असल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी ५० वर्षांपुढील दुर्मीळ झाडे १७२ असल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. महापालिका क्षेत्रात दरवर्षी वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. 

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार