शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मालेगावी शेतकऱ्याची न्यायासाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 10:50 PM

मालेगाव :तालुक्यातील माळमाथ्यावरील गुगळवाड येथील शेतकरी भाऊसाहेब निकम गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमालाचे पैसे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु कांदा व्यापाऱ्याकडे अडकलेले १५ हजार ९१ रुपये अजून मिळाले नसल्याने संबंधित शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देकांदा मालाचे २० हजार अडकले; सहा महिन्यांपासून व्यापाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

मालेगाव :तालुक्यातील माळमाथ्यावरील गुगळवाड येथील शेतकरी भाऊसाहेब निकम गेल्या सहा महिन्यांपासून शेतीमालाचे पैसे मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु कांदा व्यापाऱ्याकडे अडकलेले १५ हजार ९१ रुपये अजून मिळाले नसल्याने संबंधित शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे.भाऊसाहेब निकम यांनी २५ एप्रिल रोजी झोडगे मार्केटला २७ क्विंटल २० किलो कांदा माल ७५० रुपये भावाने परवानाधारक कांदा व्यापारी किरण वसंतराव पारखे (चांदवड) यांना विकला. आडत, हमाली काढून २० हजार ९१ रुपये एवढे बिल झाले. शेतमाल १० मे रोजी घेताना तसे पावतीवरदेखील लिहून दिले. निकम यांनी विश्वास ठेवत मान्य केले, मात्र त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. तेव्हापासून ते हक्काच्या पैशासाठी या व्यापाऱ्याला सारखा फोन करीत आहेत, मात्र सतत उडवाउडवीची उत्तरे मिळत असून, कधी फोन बंद, कधी उचलतच नाही त्यामुळे शेतकरी कंटाळला आहे.मालेगाव मार्केट कमिटीत अर्जफाटे करून झालेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासमोरही फोनद्वारे समस्या मांडली, त्यांनीही व्यापाऱ्याला शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी तंबी दिली, मात्र तीही लागू झाली नाही. निकम हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यासाठी वीस हजार ही खूप मोठी रक्कम आहे. व्यापाऱ्याने दिवाळीत फोनपेद्वारे फक्त पाच हजार दिले.हे चुकते शेतकऱ्यांचेशेतकरी वेळोवेळी व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे काढण्यासाठी मार्केट कमिटीकडे अर्जफाटे करतात, मात्र पोच घेत नाहीत. त्यामुळे कोणी त्यांना बोलू देत नाहीत. शिवाय युनियन नसल्याने शेतकरी एकजूट नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.