शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

प्रदूषणमुक्त दिवाळी करूया...

By किरण अग्रवाल | Updated: November 4, 2018 00:59 IST

दीपोत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठीच नव्हे, तर आपल्या स्वत:साठीही नुकसानदायी ठरणार नाही ना, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरण जपायचे असेल तर आपल्या आनंदाच्या कल्पना काहीशा बदलून फटाकामुक्त दिवाळी साजरी करावी लागेल.

ठळक मुद्दे दिवाळी साजरी करताना ती प्रदूषणमुक्त अगर पर्यावरणपूरक असेल याची काळजी घेणे गरजेचेयंदा फटाक्यांचा धूर न करण्याची शपथ अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतली आहे.यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करून पर्यावरणाला हातभार लावूया...

सारांशदीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा सण असल्याने चिंता करण्यासारखे मुद्दे कमी नसताना तो साजरा करण्याची एव्हाना सर्वांचीच तयारी झाली आहे. या चिंतेच्या विषयात वैयक्तिक व सार्वजनिक स्तराचेही अनेक मुद्दे असून, महागाई व त्यात पडलेली दुष्काळी स्थितीची भर प्रामुख्याने नोंदविता येणारी आहे. पण त्याहीखेरीज वाढते वायु व ध्वनिप्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर तसेच आरोग्यावरही होणारा प्रतिकूल परिणाम लक्षणीय असल्याने; त्याकडे दुर्लक्ष करता येणारे नाही. कारण, ही बाब प्रत्येकाशीच, म्हणजे अगदी नवजात बाळापासून ते आयुष्याची सांजकाल अनुभवणाऱ्या ज्येष्ठांपर्यंत साºयांशीच निगडित आहे. त्यामुळे यंदा दिवाळी साजरी करताना ती प्रदूषणमुक्त अगर पर्यावरणपूरक असेल याची काळजी घेतली जाणे अत्यंतिक गरजेचे ठरले आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी आली असल्याने बळीराजा तसा चिंतातुरच आहे. शासनाने आपल्या राजधर्माला जागत काही तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करून विविध सोयी-सवलती दिल्याने या चिंतेची तीव्रता नक्कीच कमी व्हावी; पण म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवावेत असेही नाही. त्यात महागाई कमी नाही. स्वयंपाकाच्या ‘गॅस’चाच असा काही भडका उडाला आहे की, आपले केरोसिन व मातीच्याच चुली बºया म्हणण्याची वेळ यावी. मुद्दे अनेक आहेत; पण दिवाळीच्या तोंडावर नको त्याचीच चर्चा. सभोवताली चांगलेही बरेच काही घडत असते. त्यातूनच प्रेरणेचा मार्ग प्रशस्त करायला हवा. भिंतीवरल्या काळ्या डागाकडे पाहण्यापेक्षा पांढºया कवडशाकडे बघितलेलेच अधिक बरे. दिवाळी तर प्रकाशाचाच उत्सव. अंधारलेल्या काळोखावर सकारात्मकतेचा, आशेचा दीप लावला तर अंधार दूर होण्यास नक्कीच मदत घडून येईल. हा काळोख अगर अंधार केवळ समस्या, विवंचनांचाच नाही. तो पर्यावरणाला बाधा पोहोचवून मनुष्य-प्राण्यांच्या जिवाला हानी पोहचविणाराही ठरू पाहतो आहे. म्हणूनच, ही दिवाळी साजरी करताना विशेषत: प्रदूषणमुक्तीचा प्रकाश उजळण्याची गरज आहे.पर्यावरण रक्षणाची निकड शाळकरी मुलांमध्ये अधिक परिणामकारकपणे रुजत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. गणेशोत्सवाच्या काळातही शाळा-शाळांमधील मुलांनी शाडूमातीच्या मूर्तींसाठी पुढाकार घेतल्याने गणेशोत्सव बºयापैकी पर्यावरणपूरकपणे पार पडला. मिरवणुकांतील ‘डीजे’च्या दणदणाटावर बंदी आणली गेल्यानेही ध्वनिप्रदूषणास मोठा आळा बसला. त्याप्रमाणेच यंदा फटाक्यांचा धूर न करण्याची शपथ अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मुलेच फटाक्यांसाठी आग्रही राहणार नसतील तर पालकांचा दुहेरी लाभ घडून येईल. एकतर खरेदीचा खर्च टळेल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे फटाकामुक्ततेतून पर्यावरणपूरक दिवाळीच्या मोहिमेत त्यांचा सहभाग घडून येईल. याशिवाय, दीपावलीत फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही दोन तासांची वेळ निर्धारित करून दिली आहे. आपल्यातील न्यायप्रियता कायम असल्याने या निर्णयाचा नक्कीच परिणाम अपेक्षित आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करून त्यानुसार मापनपद्धती अवलंबिली आहे. या साºयांच्या एकत्रित परिणामातून यंदाच्या दिवाळीत खºयाअर्थाने विषमुक्ततेच्या दिशेने प्रभावी पावले पडलेली दिसून यावीत.महत्त्वाचे म्हणजे, याबाबतीतली जाणीवजागृती जेवढी प्रभावी तितका त्याचा परिणाम अधिक असतो. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्र्यांनीही प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी आवाहन केले आहे. सामाजिक संस्थाही त्यासाठी पुढे आलेल्या आहेत. तेव्हा हे जागरण प्रत्यक्ष नुकसानीची जाणीव करून देणारेही असेल तर ते अधिक पोहोचेल. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात वायुप्रदूषणामुळे म्हणजे प्रदूषित हवेमुळे २०१६मध्ये जगात सहा लाख मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. वायुप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने जगातील १५ वर्षे वयाच्या आतील तब्बल ९३ टक्के मुलांना श्वसनाशी संबंधित आजाराचा सामना करावा लागत असल्याचेही यात म्हटले आहे. फटाके फोडताना त्यातून निघणाºया धुराचा व त्यातील विषारी घटकांचा गर्भातील बाळांवरही घातक परिणाम होत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. अस्थमा रुग्णांसाठी व लहान मुले तसेच ज्येष्ठांनाही फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज व त्यातून घडून येणारे प्रदूषण हानिकारकच असते. मग कशाला फोडायचे असे फटाके? तेव्हा, चला यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करून आपणच आपले आरोग्य जपण्यासाठी पर्यावरणाला हातभार लावूया... 

टॅग्स :NashikनाशिकDivaliदिवाळीSocialसामाजिकpollutionप्रदूषणfire crackerफटाके