शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात शिवसेनेची अवस्था बिकट, आमची कोठेही शाखा नाही म्हणण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:11 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होणार किंवा नाही अशा शंका घेतल्या जात होत्या. उभयबाजूने युती होणार असे सांगितले असले तरी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा केला जात होता

संजय पाठक 

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरीस युतीने अधिकृतरीत्या घोषणा न करताच थेट उमेदवाऱ्या घोषित केल्या आहेत. बंडाळी टाळण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने कोणता मतदारसंघ कोणाला सोडला हे जाहीर केले नसले तरी थेट उमेदवारी घोषित करण्यामुळे नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाने आपल्या ताब्यातच ठेवले आहेत. त्यामुळे शिवसेनेची अवस्था बिकट झाली असून जर चार पैकी तीन मतदारसंघ भाजपाला जाणार असतील तर भविष्यात नाशिक शहरात आमची कोठेही शाखा नाही असे फलक लावावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात शिवसैनिकांच्या भावना काहीही असल्या आणि भाजपावर रोष व्यक्त होत असला तरी मुळातच शिवसेना नेतृत्वाने नमते घेतल्याचाच हा परिणाम आहे. तर भाजपाची दूरदृष्टीदेखील यास कारणीभूत असून, भविष्यात महापालिकांवर कब्जा करण्यासाठी ही खेळी उपयुक्त ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होणार किंवा नाही अशा शंका घेतल्या जात होत्या. उभयबाजूने युती होणार असे सांगितले असले तरी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा केला जात होता. भाजपाच्या ताब्यातील अमूक मतदारसंघ सेनेला हवा तर सेनेच्या ताब्यातील काही मतदारसंघ भाजपाला हवे होते. बरे तर इनकमिंग वाढल्यामुळे दोन्ही पक्षांत इच्छुकांचे पीक वाढले होते. अशांना इच्छुकांच्या दबावाला न जुमानता तिकीट वाटप करण्याचे कठीण होते. त्यामुळे उभय पक्षांनी युतीची अधिकृत घोषणा न करताच थेट उमेदवारी घोषित करणे सुरू केले. भाजपाने तरी रीतसर यादी घोषित केली. परंतु शिवसेनेने तर थेट मुंबईस बोलावून उमेदवारांना ए-बी फॉर्मचे वाटप करून दिले. भाजपाने विलंबाने यादी घोषित केली असून यात नाशिक, पुणे अशा शहरी भागात भाजपाने विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवले असून, सेनेला ठेंगा दाखवला आहे.

नाशिक शहराचा इतिहास बघितला तर नाशिक शहरात २००९ पूर्वी नाशिक आणि नाशिकरोड-देवळाली असे दोनच मतदारसंघ होते. त्यातील नाशिक मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व होते तर नाशिकरोड-देवळाली या राखीव मतदारसंघात सातत्याने माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या रूपाने शिवसेनेने प्राबल्य राखले. २००९ मध्ये प्रथमच मतदारसंघाच्या पुनर्रचना झाली आणि नााशिक शहरात दोनऐवजी नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली असे चार मतदारसंघ झाले. यातील देवळाली मतदारसंघात शहरी भाग कमी होऊन ग्रामीण भाग वाढला. २००९ मध्ये मनसेने धक्कादायक यश मिळवून बाजी मारली.

मात्र २०१४ मध्ये युती तुटली आणि तीच भाजपाच्या पथ्यावर पडली. नरेंद्र मोदी लाटेत लोकसभेत सत्ता आली, परंतु त्याचबरोबर विधानसभेत सत्ता येताना नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपाकडे आल्या. साहजिकच विद्यमान आमदार असलेल्या जागा सोडायच्या नाहीत, या भाजपाच्या खेळीने शिवसेनेची अडचण झाली. नाशिक शहरात नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेनेचे नगरसेवक अधिक आहे. त्याच सलग दोन लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने सेनेला सर्वाधिक मते मिळवून दिली. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा आणि त्या निमित्ताने शहरातील चारपैकी दोन मतदारसंघ सेनेकडे यावे, असा प्रयत्न होता. मात्र ती अपेक्षा फोल ठरली. शिवसेनेच्या नेतृत्वाने हा मतदारसंघ मिळावा म्हणून फार प्रयत्न केले नाही. विधानसभेच्या शहरी भागातील मतदार संघापाठोपाठ तेथील महापालिका खिशात घालण्याची ही एक खेळी आहे हे उघड आहे.

नाशिक महापालिकेचा विचार केला तर शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका निभावून उपमहापौरपदासारखी दुय्यम पदे भाजपाला दिली आहेत. युती असूनदेखील कधीही भाजपाला महापौरपद मिळू दिलेले नाही. २०१२ मध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजपाला अवघ्या १५ जागा नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मिळाल्या, परंतु नंतर मात्र २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने १२२ पैकी तब्बल ६६ जागा मिळवल्या आणि भाजपा युती करण्यासाठी धडपडत असतानादेखील सत्तेत सहभाग मिळू दिला नाही. आतादेखील नाशिकच नव्हे तर राज्यातील मोठ्या महापालिकांवर भाजपाचा डोळा आहे हे उघड आहे. परंतु त्यामुळे शिवसेनेचे संघटन मात्र अडचणीच आले आहेत. दोन तृतीयांश भागात भाजपाचे वर्चस्व असेल तर सेनेची अवस्था बिकट होईलच, परंतु पक्ष वाढणार नाही इतकेच नव्हे तर या शहरात आमची कोठेही शाखा नाही असे म्हणण्याची वेळ येईल, अशी भावना संतप्त शिवसैनिक व्यक्त करीत असून ती रास्तच आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक