शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Maharashtra Election 2019 : राज यांच्या ‘सेटलमेंट’च्या विधानाने नाशिककर खरंच ‘सेंटीमेंटल’ झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 08:43 IST

मनसेने महापालिका निवडणुकीत तब्बल 40 जागांवर विजय मिळविला होता.

- धनंजय वाखारे

नाशिक : ‘सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी कोठेही घरंगळून न जाणारा व सेटलमेंट न करणारा विरोधी पक्ष आपल्याला हवा आहे, असे विधान नाशिकच्या जाहीर सभेत करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकमधील सत्ताप्राप्तीचा इतिहासच सेटलमेंटवर रचला गेला आहे. आताही विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसे-राष्ट्रवादी यांची छुपी युती काही मतदारसंघात समोर आली आहे, त्यात नाशिक पूर्वमधील सेटलमेंटचा समावेश आहे. त्यामुळे राज यांच्या भाषणामुळे नाशिककर खूपसे सेंटीमेंटल झाले असतील, असे म्हणता येणार नाही. 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदाच लढलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 13 जागांवर विजय संपादन करत दबदबा निर्माण केला होता.  या 13 आमदारांपैकी तीन आमदार नाशिक शहरातून निवडून गेले होते. विधानसभा निवडणुकीनंतर 2012मध्ये झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज यांच्या मनसेने पुन्हा एकदा करिश्मा दाखविला. विधानसभा निवडणुकीत मनसेची निर्माण झालेली हवा दोन वर्षानी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही कायम राहिली. मनसेने महापालिका निवडणुकीत तब्बल 40 जागांवर विजय मिळविला होता. महापालिकेत मनसे सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून उदयास आला होता. कॉँग्रेसने 15, राष्ट्रवादीने 20, शिवसेनेने 19, भाजपने 14, माकपाने 3 जागांवर विजय मिळविला होता तर 11 उमेदवार अपक्ष  निवडून आले. 

मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून गेले असले तरी बहुमतासाठी अन्य पक्षांच्या कुबडय़ा लागणारच होत्या. राज्यात पहिल्यांदा महापालिकेत सत्तातुर झालेल्या मनसेने त्यावेळी पहिली सेटलमेंट केली तर भाजपशी. महापालिकेत भाजपबरोबर हातमिळवणी करत मनसेचा पहिला महापौर विराजमान झाला. आपण नव्हे तर भाजपनेच आपल्याला पाठिंबा देऊ केल्याचे नंतर राज सांगत राहिले. दरम्यान, भाजपबरोबर बिनसल्यानंतर मनसेने पुढील अडीच वर्षातही सत्ता आपल्या हाती राहावी यासाठी पुन्हा सेटलमेंट केली ती राष्ट्रवादीबरोबर. महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी वारे फिरले अन् भुजबळ फार्मवरून आलेला आदेश शिरसावंद्य मानत राष्ट्रवादीसह कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी मनसेच्या उमेदवाराच्या पारड्या आपले वजन टाकले.

पाच वर्षे नाशिक महापालिकेची सत्ता उपभोगल्यानंतर 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेची मोठी वाताहत झाली. 40 पैकी तब्बल 31 नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. निवडणुकीत मनसेचे अवघे पाच नगरसेवक निवडून आले. सध्या नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मनसेने भाजपच्या सत्ताकाळातही प्रभाग समितीच्या सभापतिपदासारख्या दुय्यम अशा पदासाठी सेटलमेंट केली आणि सातपूर, नाशिक पश्चिम विभागात सभापतिपदावर समाधान मानले. 

आता विधानसभा निवडणुकीत मनसे मैदानात उतरणार की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती असल्यामुळे नाशिक पूर्वमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराने ऐनवेळी भाजपचे कमळ हाती घेतले. मनसेने नाशिक शहरातील चार जागांवर उमेदवार जाहीर केले; परंतु नाशिक पूर्वमध्ये ऐनवेळी आपल्या उमेदवारास माघारी घेण्यास लावत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपले बळ उभे केले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही आणखी एक सेटलमेंट नाशिककरांनी पाहिली व अनुभवली. त्यामुळे नाशिकमध्ये सेटलमेंटचा इतिहास असताना पुन्हा त्याच नाशिककरांसमोर राज यांनी आपल्याला सेटलमेंट न करणारा विरोधी पक्ष हवा आहे, असे विधान केल्याने नाशिककरांच्या भ्रुकुट्या वगैरे काही उंचावल्या गेल्या नाही तर राज यांच्या आणखी एका भाषणाची गंमत अनुभवली, असेच काहीसे म्हणावे लागेल. 

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019