शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महायुतीच्या निकालावर मतभेदांचा परिणाम नाही: अनुराग ठाकूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2024 12:23 IST

नाशिकमध्ये मांडली भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: इंग्रज गेले आणि फोडा आणि सत्ता काबीज करा हे सूत्र काँग्रेस पक्षाला देऊन गेले. मात्र पंतप्रधानांच्या काळात सब का साथ, सब का विकास सूत्र यावर सरकारची वाटचाल सुरू आहे. 'बटेंगे तो कटेंगे' यावर पक्षात असलेल्या काही वरिष्ठ नेत्यांचा सूर वेगळा असला तरी विचारभेदाचा परिणाम महायुतीच्या निकालावर होणार नसल्याचे स्पष्ट संकेत माध्यमांशी बोलताना माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. 

भारतीय जनता पार्टीचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी पक्षाच्या मीडिया सेंटर येथे शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी लक्ष्मण सावजी, सुनील बच्छाव, प्रशांत जाधव, राहुल कुलकर्णी, गणेश कांबळे, सुहास शुक्ल उपस्थित होते. 

ठाकूर पुढे म्हणाले की, जे देशाच्या ध्रुवीकरणाचे स्वप्न पाहत आहेत, त्या काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सरकारला प्रत्युत्तर म्हणून एक है तो सेफ है असे सांगणे गैर नाही. आमच्या पक्षासह मित्रपक्षाच्या नेत्यांना मत मांडायचे असेल तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार बहाल केला आहे. त्यांच्या त्या विधानाचा भविष्यात राज्यातल्या महायुतीच्या निकालावर परिणाम होणार नसून नाशिकच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल. सिंहस्थ कुंभमेळा काळात प्रस्तावित निओ मेट्रो ट्रेनसह गोदा पार्क प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही यावेळी ठाकूर यांनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNashikनाशिक