शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

मॅडम, मला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:01 IST

शेतात दोनवेळा पेरणी केली, दुबार पेरणी करूनही पीक जळून गेले... यावर्षीही हातात काहीच आलं नाही... उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे दीड लाखाचे, तर महाराष्टÑ बॅँकेचे साडेचार लाखांचे डोक्यावर कर्ज. त्यात वीजबिल भरणाही करायचा यामुळे मी परेशान झालोय... सांगा मॅडम, मी जगायचं तरी कसं...? मला तर आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही, असे उद्विग्न उद्गार हताश झालेले शेतकरी शिवाजी मुरलीधर देवरे यांनी मेहुणे येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीसमोर काढले. यावेळी समिती सदस्यांसह उपस्थित शासकीय अधिकाºयांचेही डोळे पाणावले.

ठळक मुद्देमेहुणेतील शेतकऱ्याचे उद्विग्न उद्गार : अधिकाºयांचेही डोळे पाणावले

मालेगाव : शेतात दोनवेळा पेरणी केली, दुबार पेरणी करूनही पीक जळून गेले... यावर्षीही हातात काहीच आलं नाही... उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे दीड लाखाचे, तर महाराष्टÑ बॅँकेचे साडेचार लाखांचे डोक्यावर कर्ज. त्यात वीजबिल भरणाही करायचा यामुळे मी परेशान झालोय... सांगा मॅडम, मी जगायचं तरी कसं...? मला तर आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही, असे उद्विग्न उद्गार हताश झालेले शेतकरी शिवाजी मुरलीधर देवरे यांनी मेहुणे येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीसमोर काढले. यावेळी समिती सदस्यांसह उपस्थित शासकीय अधिकाºयांचेही डोळे पाणावले.‘सांत्वन’ तरी कसे करणार..! दुष्काळ पाहणी दौºयातील सदस्यांना शब्दही फुटेना...!मेहुणेचे सरपंच निवृत्ती देवरे यांनीही दुष्काळाची भीषणता कथन केली. आमचा गाव चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसतोय... दूध आणि कांद्याला भाव नाही... दुष्काळाने गंभीर स्थिती केलीय मॅडम..! आम्हाला उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. कमाईचे साधन नसल्याने मुलाबाळांसह संसाराचा गाडा तरी आम्ही कसा हाकणार? शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केली तरच आम्हाला जगायला बळ मिळेल, असे सरपंच देवरे यांनी सांगितले.यानंतर दुष्काळ पाहणी पथक वºहाणेकडे मार्गस्थ झाले. वºहाणे शिवारातील बाजीराव पवार यांच्या डाळिंबबागाची पाहणी केली. पवार यांनी गेल्या चार वर्षांपासून डाळिंबबागेवर खर्च केला आहे. स्टेट बॅँकेचे साडेतीन लाख रुपये कर्ज आहे, असे पवार यांनी पथकाच्या छावी झा यांना सांगितले. यावेळी झा यांनी कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रतिप्रश्न केला. यावर पवार म्हणाले, कुछ नही मॅडम, बाटली लेंगे और पी लेंगे असे शब्द उद्गारल्याने समितीसह उपस्थित अधिकाºयांचे मन हेलावले.शेतकºयांनी दुष्काळी स्थितीच्या मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील केंद्रीय जल आयोगाच्या सहसचिव श्रीमती छावी झा, एमएनसीएफसीच्या सहायक संचालक डॉ. शालिनी सक्सेना, केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, डीटीचे संचालक ए. के. तिवारी या चार सदस्यीय पथकाकडे मांडल्या.पथकासमवेत जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे विनोद शेलार, आबा साळुंके, राज्याचे पुनर्वसन व रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., येवल्याचे प्रांताधिकारी भीमराव बोराळे, आदी उपस्थित होते.सक्तीची वीजबिल वसुली थांबवावीच्पाण्याची बाटली २० रुपयाला विकली जाते, तर दुधाला अत्यल्प भाव दिला जातो. पीकविमा काढूनही लाभ दिला जात नाही. मनरेगाच्या कामांची मजुरी अत्यल्प आहे. दोनशे रुपये रोज दिला जातो अशी तक्रार करीत यात वाढ करावी, वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, बॅँक शाखांकडून सुरू असलेली कर्जवसुली आदी मागण्या शेतकºयांनी पथकाकडे केल्या.च्मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथे पाहणी करत असतानाच गावात पाण्याचा टॅँकर आल्याने महिलांची पाण्यासाठी एकच झुंबड उडाली. टॅँकरचे पाणी हौदात पडत असतानाच महिला पाणी भरण्यासाठी धडपडत होत्या. टॅँकरने पुरविण्यात येणारे पाणी पुरत नसल्यामुळे जास्तीत जास्त पाणी मिळविण्यासाठी महिलांना अशी धडपड करावी लागते असे स्थानिक नागरिकांनी पथकातील अधिकाºयांना सांगितले.

टॅग्स :Malegaonमालेगांवdroughtदुष्काळGovernmentसरकार