शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कमी दाबाने मिळतेय आवर्तनाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:41 IST

मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई :मनमाडकरांचा दुष्काळात तेरावा महिना !

मनमाड: मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. सव्वा लाख लोकसंखेच्या मनमाड शहराची तहान भागवणारा पाटोदा साठवणूक तलाव पुर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.मनमाड शहरासाठी पालखेड धरणाच्या पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडले जाणार होते.मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे हा कालावधी लांबत जाउन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन दहा ते बारा दिवस उशीराने सोडण्यात आले .पालखेड धरणातून कॅनाल द्वारे निघालेले पाणी गुरूवारी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटोदा येथील साठवण तलावात आवर्तण सोडल्यानंतर तब्बल पाच दिवसांच्या विलंबाने पोहचले.मात्र हे पाणी पुर्ण क्षमतेने व पुर्ण दाबाने पोहचत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.पाटबंधारे प्रशासनाने चार पंपाचे पाणी सुरू ठेवावे आणि पाटोदा साठवणुक तलाव भरून द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी दिला आहे.शहराची गंभीर पाणी टंचाई लक्षात घेता ४० द.ल.घ.फु. पाणी मिळणे अपेक्षीत आहे.हे पाणी पुढील रोटेशन मिळेपर्यंत म्हणजे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.पालीकेच्या शिष्टमंळडळाने पाटोदा साठवण तलावावर भेट देउन पहाणी केली. या वेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते अलताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे,विजय मिश्रा, गालीब शेख, पापा थॉमस, बब्बू कुरेशी,स्वराज देशमुख आदी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाडकरांना गेल्या काही महिन्यांपुर्वी दहा ते बारा दिवसाआड होणाºया पाणी पुरवठ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या पाणीपुरवठ्याच्या दिवसांमधे वाढ होत जाउन तो कालावधी आज २० दिवसांच्या वर जाउन पोहचला आहे. त्यातच आवर्तण सुटण्यास झालेला विलंब व आता कमी दाबाने मिळणारे आवर्तणाचे पाणी या मुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी