शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नाशकात नववसाहतींत कमी दाबाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:09 IST

वाढत्या तक्रारी : पालिकेकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन

ठळक मुद्देगंगापूर धरणात सद्यस्थितीत ३९२६ दलघफू म्हणजे ७० टक्के पाणीसाठा शिल्लकशहरात वातावरणातील उष्मा हळूहळू वाढत असून कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरूवात झालेली आहे

नाशिक - शहरात वातावरणातील उष्म्यात वाढ होत असतानाच काही उपनगरांसह नव्याने विकसित होत चाललेल्या वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जलकुंभनिहाय नियोजनावर भर देण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात सद्यस्थितीत ३९२६ दलघफू म्हणजे ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दरम्यान, गंगापूर धरणात ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आता शहरात वातावरणातील उष्मा हळूहळू वाढत असून कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरूवात झालेली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही हळूहळू वाढत आहे. त्यामुळे, शहरातील काही उपनगरांसह नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. प्रामुख्याने, पंचवटी, नाशिकरोड आणि पूर्व विभागातील काही उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले जात आहे. ब-याच ठिकाणी पाण्याची वेळ दोन तासांची असतानाही एक ते सव्वा तासच पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी करंगळीएवढे पाणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढत असल्याने त्यात कमी पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

लवकरच पाणीपुरवठा सुरळीत

शहराच्या हद्दीलगतच्या नववसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या काही तक्रारी येत आहेत परंतु, उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असल्याने शेवटच्या टोकापर्यंत होणा-या पाणीपुरवठा वितरणात अडचणी उद्भवत आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागामार्फत त्याबाबतचे नियोजन केले जात असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.- शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता, मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी