कॉँग्रेसच्या कोट्यातून जिल्हाध्यक्षांना लागणार लॉटरी

By Admin | Updated: June 7, 2014 01:46 IST2014-06-07T01:27:58+5:302014-06-07T01:46:01+5:30

राज्यपाल नियुक्त कोट्यातील नावे कळविण्यावरून नाशिक जिल्ह्णातून डॉ. शोभा बच्छाव, शरद अहेर, जयप्रकाश छाजेड राजाराम पानगव्हाणे आदि स्पर्धेत.

The lottery will require the district president to quote the Congress quota | कॉँग्रेसच्या कोट्यातून जिल्हाध्यक्षांना लागणार लॉटरी

कॉँग्रेसच्या कोट्यातून जिल्हाध्यक्षांना लागणार लॉटरी

नाशिक : राज्यपाल नियुक्त कोट्यातील नावे कळविण्यावरून कॉँग्रेसमध्ये स्पर्धा जोरात सुरू असून, नाशिक जिल्ह्णातून इच्छुक असलेल्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शरद अहेर, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदि स्पर्धेत असले तरी शेवटच्या क्षणी राजाराम पानगव्हाणे यांच्या नावावर एकमत होण्याची चर्चा आहे.
जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे शुक्रवारी मुंबईतच असल्याने या चर्चेला पेव फुटल्याचे चित्र होते. स्वत: पानगव्हाणे यांनी कॉँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्तीसाठी कोणाचे नाव गेले, याबाबत माहिती नसल्याचे सांगितले तरी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबत मात्र इन्कार केला नाही. मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पालकमंत्री छगन भुजबळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक माजी जिल्हा बॅँक अध्यक्ष परवेज कोकणी यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने त्यावर कॉँग्रेसकडून मराठा कार्डची व्यूहरचना आखण्याची तयारी सुरू असून, त्यातूनच जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचे नाव स्पर्धेत आल्याचे कळते. अर्थात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव तसेच माजी युवक प्रदेश अध्यक्ष शरद अहेर यांचे नावही मराठा कार्डमुळेच स्पर्धेत असून, नंदुरबारला चंद्रकांत ऊर्फ भैया रघुवंशी यांना नुकतीच विधान परिषदेला संधी मिळाल्याने आता कॉँग्रेसकडून मराठा कार्ड खेळण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या इच्छुकांतून अंतिम यादी एक-दोन दिवसांत अधिकृत दिली जाणार असल्याचे कळते.(प्रतिनिधी)

Web Title: The lottery will require the district president to quote the Congress quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.