शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नाशिकमध्ये तोटा मग बस मुंबई ठाण्याला पाठविल्या कशा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 01:06 IST

नाशिक- शहरातील बस सेवा चालवण्यात तोटा येतो असे म्हणणा-या राज्य परीवहन महामंडळाला नाशिक शहरात अन्य खासगी प्रवासी साधने बंद असताना उत्पन्न वाढीची संधी मिळाली होती. मात्र,पूर्व ग्रह दुषीत ठेवून येथे प्रवाशांना टाळण्यात आले. दुसरीकडे मात्र नाशिक शहरातील ७५ बस मुंबई आणि ठाण्याला पाठविण्यात आल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआत बटयाचा व्यवहार; शहरातील उत्पन्नाची संधी दवडली

नाशिक- शहरातील बस सेवा चालवण्यात तोटा येतो असे म्हणणा-या राज्य परीवहन महामंडळाला नाशिक शहरात अन्य खासगी प्रवासी साधने बंद असताना उत्पन्न वाढीची संधी मिळाली होती. मात्र,पूर्व ग्रह दुषीत ठेवून येथे प्रवाशांना टाळण्यात आले. दुसरीकडे मात्र नाशिक शहरातील ७५ बस मुंबई आणि ठाण्याला पाठविण्यात आल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.लॉकडाऊन काळात सर्व प्रवासी वाहने ठप्प होती. त्यात सार्वजनिक वाहतूकीचा देखील समावेश होता. मात्र जसे जसे लॉक डाऊनचे निर्बंध शिथील झाले जनजीवन सुरळीत होत गेले. ग्रामीण भागात एसटी बस सुरू झाल्या. आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर देखील नाशिक शहरात मात्र ही सेवा सुरू झाली नाही. शहरात रिक्षा आणि खासगी टॅक्सी (कॅब) सेवा बंद असल्याने प्रवाशांची अडचण झाली. सुूरूवातीला दुचाकीला प्रवासाची परवानगी देण्यात आली असली तरी त्यावर एकालाच परवानगी होती. डबलसिट असलेल्या मोटार सायकल स्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरीकांना प्रवासाचे सक्षम साधन मिळत नव्हते. मात्र, या काळात देखील एसटीने बस सेवा सुरू करून प्रवाशांची अडचण दूर करण्यास स्वारस्य दाखवले नाही. या काळात एसटीला साथ देणा-या प्रामुख्याने कामगार वर्गाची मोठी अडचण झाली ती आजही कायम आहे.सामान्य कामगार हे बसनेच प्रवास करतात परंतु त्यांची सोय नसल्याने कारखान्यात कामगार देखील येऊ शकत नव्हते. मात्र, एसटीने अशा काळात व्यवहार्यता दाखवली असती तर प्रवाशांची अडचण दूर झाली असती आणि एसटीचा महसूल वाढला असता मात्र पूर्वग्रह दुषीत ठेवून नाशिकमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली नाही.एकीकडे ही सेवा सुरू करण्यासाठी तोटा आणि अन्य कारणे देणा-या महामंडळाने मुंबईत मात्र बेस्टच्या मदतीला धाव घेतली. लोकल सेवा बंद असल्याने आता अजूनही सेवा अपुरीच असल्याने मुंबईतील चाकरमान्यांना बस सेवा आधार ठरली. त्यांच्यासाठी राज्यभरातून महामंडळाने एक हजार बस धाडल्या आहेत. यात नाशिक शहरातील ७५ बस पाठविण्यात आल्या आहेत. यात ५० बस मुंबई सेंट्रल तर२५ बस ठाण्याला पाठविण्यात आल्या आहेत. तेथील प्रवाशांची सोय करणे गैर नाही मात्र, तेथील प्रवाशांची सोय मग नाशिकमधील सामान्य प्रवाशांवर अन्याय कशासाठी असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. महामंडळाच्या अधिका-यांना नाशिकचे वावडे का असा प्रश्न केल जात आहे.राज्य शासनाचे राज्य परीवहन महामंडळ असले तरी आता शासन आणि महामंडळाचा काही अर्थाअर्थी संबंध आहे का असा प्रश्न पडतो. नाशिकमध्ये सेवा न देता मुंबईला मात्र बस पाठविल्या जात आहेत. लॉक डाऊन काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसताना प्रवाशांची अडचण झाली. ही अडचण परिवहन महामंडळाला दुर करता आली असती. मात्र तसे झाले नाही. आता महामंडळ हे वेगळे न ठेवताशासनाचेच एक खाते असले पाहिजे. शासन महामंडळाविषयी नेमकी भूमिका घेत नसल्याने प्रवाशांचीच नव्हे तर एसटीच्या कर्मचा-यांची आर्थिक अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे शासनाने एकुणच एसटी बाबत धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे.- प्रा. दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ नेतेहे निर्णय कोण घेते?नाशिक शहरात बस सेवा चालवायची नाही असा निर्णय शासनाच्या अथवा महामंडळाच्या कोणत्या निर्णयाने घेण्यात आला. याबाबत आता प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. काही प्रवासी संघटना आणि ग्राहक संघटना आता माहिती मागवणार आहेत. त्यामुळे महामंडळाच्या अधिका-यांना थेट उत्तरे द्यावी लागणार आहेत.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स