शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

ओतूर परिसरात खरीपाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:33 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात परतीच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, उन्हाळ कांद्याचे रोप या पिकाना मोठा तडाखा बसला आहे. सरकारी यंत्रणेने सरसकट पंचनामे केलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने बळीराजा पूर्णपणे खचला आहे. शेतातील उभ्या पिकासह कापणी झालेल्या बाजरी व मका आदी खरीपाच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पिकांच्या बी-बियाणे, खते व मजुरी यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी यासह उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे. खरीप पिकाच्या उत्पन्नावर रब्बी पिकाचे नियोजन अवलंबून असते परंतु यावर्षी नुकसानीपलिकडे शेतक-यांच्या हाताशी काहीच लागले नाही, त्यामुळे रब्बीची चिंता त्यांना सतावत आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते, परंतु त्यासाठी लागणा-या रोपांचे नुकसान झाल्याने शेतकरी गेल्या दोन दिवसापासून रोपांची लागवड करण्यात मग्न आहे. खरीप हंगामाकडून नुकसान झाल्याने शेतक-यांना रब्बी पिकांच्या उत्पादनाची आस लागून आहे. उन्हाळी कांद्यावरच शेतकरी वर्गाचे पुढील नियोजन अवलंबून असते. पावसाने पंधरा ते वीस दिवस धुमाकुळ घातल्याने शेतातील मका व बाजरीची कापणी केलेल्या कणसांना कोंब फुटले आहेत. उभी पिके जास्त पाणी साचल्याने सडली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करु न शेतक-यांना भरपाई द्यावी अशी मागणीओतूर परीसरातील बळीराजाने केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस