शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

ओतूर परिसरात खरीपाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:33 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात परतीच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, उन्हाळ कांद्याचे रोप या पिकाना मोठा तडाखा बसला आहे. सरकारी यंत्रणेने सरसकट पंचनामे केलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने बळीराजा पूर्णपणे खचला आहे. शेतातील उभ्या पिकासह कापणी झालेल्या बाजरी व मका आदी खरीपाच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पिकांच्या बी-बियाणे, खते व मजुरी यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी यासह उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे. खरीप पिकाच्या उत्पन्नावर रब्बी पिकाचे नियोजन अवलंबून असते परंतु यावर्षी नुकसानीपलिकडे शेतक-यांच्या हाताशी काहीच लागले नाही, त्यामुळे रब्बीची चिंता त्यांना सतावत आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते, परंतु त्यासाठी लागणा-या रोपांचे नुकसान झाल्याने शेतकरी गेल्या दोन दिवसापासून रोपांची लागवड करण्यात मग्न आहे. खरीप हंगामाकडून नुकसान झाल्याने शेतक-यांना रब्बी पिकांच्या उत्पादनाची आस लागून आहे. उन्हाळी कांद्यावरच शेतकरी वर्गाचे पुढील नियोजन अवलंबून असते. पावसाने पंधरा ते वीस दिवस धुमाकुळ घातल्याने शेतातील मका व बाजरीची कापणी केलेल्या कणसांना कोंब फुटले आहेत. उभी पिके जास्त पाणी साचल्याने सडली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करु न शेतक-यांना भरपाई द्यावी अशी मागणीओतूर परीसरातील बळीराजाने केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस