शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पोलीस, तक्रारदारांवर कॅमेºयाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:40 IST

पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असतात. आता पोलीस ठाण्यातील हा सारा प्रकार उघड होणार आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलावरच कॅमेरा असून, तो तक्रारदार आणि पोलिसांच्याही हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असतात. आता पोलीस ठाण्यातील हा सारा प्रकार उघड होणार आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलावरच कॅमेरा असून, तो तक्रारदार आणि पोलिसांच्याही हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.  पोलीस ठाण्यात पोलीस आणि तक्रारदार यांच्याविषयी बºयाचदा वादाचे प्रसंग उभे राहतात. गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार पोलीस सर्वसामान्यांशी वागत असतात. कित्येकदा पोलिसांना मोठ्या आवाजात बोलावे लागते, तर अनेकदा पोलीस तक्रारदाराचे ऐकूनही घेत नाहीत. सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात आला की तो गांगरून जातो. पोलीस त्यास अधिकच घाबरून सोडतात. हे आजवर केवळ बोलले जाते. परंतु आता या साºया बाबींवर कॅमेºयाची नजर राहणार असून, कोण कुणाशी कसा वागतो यावर कॅमेºयाची नजर राहणार आहे. यातून अनेक बाबींचा खुलासा तर होईलच पोलिसांच्या वर्तणुकीत थोडाफार संयम येऊ शकेल अशीही अपेक्षा बाळगली जात आहे.  ठाणे अंमलदाराच्या टेबलावर असलेल्या संगणकाजवळच हा कॅमेरा लावण्यात आला असून, हा ९० डीग्री कोनात फिरत असल्याने सर्व हालचालींवर या कॅमेºयाचे लक्ष असणार आहे. पोलीस ठाण्यातील अपप्रवृत्तींना यामुळे आळा बसलेच शिवाय एक चांगले कार्यसंस्कृतीलाही यामुळे सुरुवात होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ तक्रादाराला होणार आहे. भयभीत अवस्थेत आलेल्या तक्रारदाराशी पोलीस संयमाने वागल्यानंतर दिलासा मिळणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात कॅमेरे पोलीस आणि तक्रारदार यांच्यातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारा हा कॅमेरा शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात लावण्यात येणार आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याची सुरुवात झालेली आहे. सदर कॅमेºयात केवळ हालचालीच नव्हे तर आवाजही रेकॉर्ड होणार आहे. या कॅमेºयामुळे पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीत पारदर्शकता येणार असून, पोलीस आणि तक्रारदार यांच्यात सामंजस्यांनी विचारविनिमय शक्य होणार आहे. समन्यायातून पोलीस, सर्वसामान्यांचे संबंध सुधारावेत हादेखील यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा