शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

लोकमत पर्यावरणोत्सव : नाशिकमध्ये तब्बल ६० टक्के पाण्याचा हिशेबच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 02:57 IST

४० टक्के पाण्याचेच बिलिंग : ४३ टक्के गळती आणि फुकटातले पाणी

अझहर शेख

नाशिक : शहराची लोकसंख्या सुमारे २० लाख इतकी असून, नाशिककरांना दररोज ५०० दशलक्ष लिटर पाणी लागते. राज्यात एकीकडे पाणी ‘महाग’ करण्याच्या हालचाली सुरू असताना नाशिकमध्ये ४३ टक्के गळती आणि बिगर महसुली पाणी आहे. विशेष म्हणजे पुरवठा होणाऱ्या ४० टक्के पाण्याचेच बिलिंग होते. उर्वरित ६० टक्के पाणी मुरते कुठे, याचा कोणालाच पत्ता नाही.

पाण्याच्या बाबतीत नाशिक शहर संपन्न मानले जाते. शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे या तीन धरणांतून पाणी मिळते. या तीन धरणांतून पाचशे दश लक्ष लिटर्स पाणी दरदिवशी घेतले जाते. महापालिकेने यापूर्वी केलेल्या आॅडिटनुसार ४३.५ टक्के पाणी वादात आहे. यात गळती आणि बेहिशेबी पाण्याचा समावेश आहे. आंतरराष्टÑीय मानकानुसार वीस टक्के गळती गृहीत धरली जाते. मात्र, येथे त्यापेक्षा अधिक गळती आहे. याशिवाय नळ जोडण्याची संख्या आणि होणारे बिलिंग याचा मेळच बसत नाही. त्यामुळे वापरल्या जाणाºया पाण्याच्या ४० टक्केच पाण्याचे बिलिंग होत असल्याने ६० टक्के पाणी नक्की मुरते कोठे, असा प्रश्न आहे.येत्या जून महिन्यात जलसंपदा विभाग नवीन दर जाहीर करण्याच्या तयारीत आहे. राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाद्वारे दरनिश्चिती केली जाणार आहे. दर वाढले तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्यरत महापालिका प्रशासनाकडूनही पाण्याचे दर वाढविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा थेट बोजा नागरिकांच्या खिशावर पडणार आहे.नाशिककरांना सध्या महापालिका घरगुती वापरासाठी १ हजार लिटरमागे ५ रुपये याप्रमाणे पाणी वापराची देय रक्कम वसूल करते, तर महापालिकेला स्वत:ला मात्र पाण्याकरिता प्रतिहजार लिटर साडेसात रुपये खर्च होतो.जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी ठरविलेल्या धोरणानुसार नाशिकमध्ये सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात दरडोई कपात होणार असून,१५० ऐवजी १३५ लिटर दरडोई पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे कपातीबरोबरच दर वाढणार असल्याने पाणीपुरवठा विभागाची अडचण होणार आहे.राजकीय वरदहस्तापोटी महापालिका प्रशासनापुढे मर्यादा येत आहेत. पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर दुप्पट दंडात्मक कारवाई करावी. थकबाकी वसुलीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पाणीचोरी करणाºयांना जे नेते पाठीशी घालतात, त्यांचे महापालिकेतील पद काढून घेतले पाहिजे. - शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमीसरासरी थकबाकी ४१ कोटी आहे. थकबाकी आणि उद्दिष्ट असे मिळून ६१ कोटीपर्यंत असून, येत्या मार्चअखेरपर्यंत प्रशासन उद्दिष्टापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. ४३ टक्के नॉन बिगर महसुली पाणी आहे, ते प्रत्येक शहरात असतेच.- संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता,पाणीपुरवठा विभाग, मनपा, नाशिकप्रति १ हजार लिटरचे दरघरगुती जोडणी "5बिगर घरगुती जोडणी "22व्यावसायिक जोडणी "27 

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरण