शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

लोकमत पर्यावरणोत्सव : नाशिकमध्ये तब्बल ६० टक्के पाण्याचा हिशेबच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 02:57 IST

४० टक्के पाण्याचेच बिलिंग : ४३ टक्के गळती आणि फुकटातले पाणी

अझहर शेख

नाशिक : शहराची लोकसंख्या सुमारे २० लाख इतकी असून, नाशिककरांना दररोज ५०० दशलक्ष लिटर पाणी लागते. राज्यात एकीकडे पाणी ‘महाग’ करण्याच्या हालचाली सुरू असताना नाशिकमध्ये ४३ टक्के गळती आणि बिगर महसुली पाणी आहे. विशेष म्हणजे पुरवठा होणाऱ्या ४० टक्के पाण्याचेच बिलिंग होते. उर्वरित ६० टक्के पाणी मुरते कुठे, याचा कोणालाच पत्ता नाही.

पाण्याच्या बाबतीत नाशिक शहर संपन्न मानले जाते. शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे या तीन धरणांतून पाणी मिळते. या तीन धरणांतून पाचशे दश लक्ष लिटर्स पाणी दरदिवशी घेतले जाते. महापालिकेने यापूर्वी केलेल्या आॅडिटनुसार ४३.५ टक्के पाणी वादात आहे. यात गळती आणि बेहिशेबी पाण्याचा समावेश आहे. आंतरराष्टÑीय मानकानुसार वीस टक्के गळती गृहीत धरली जाते. मात्र, येथे त्यापेक्षा अधिक गळती आहे. याशिवाय नळ जोडण्याची संख्या आणि होणारे बिलिंग याचा मेळच बसत नाही. त्यामुळे वापरल्या जाणाºया पाण्याच्या ४० टक्केच पाण्याचे बिलिंग होत असल्याने ६० टक्के पाणी नक्की मुरते कोठे, असा प्रश्न आहे.येत्या जून महिन्यात जलसंपदा विभाग नवीन दर जाहीर करण्याच्या तयारीत आहे. राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाद्वारे दरनिश्चिती केली जाणार आहे. दर वाढले तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्यरत महापालिका प्रशासनाकडूनही पाण्याचे दर वाढविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा थेट बोजा नागरिकांच्या खिशावर पडणार आहे.नाशिककरांना सध्या महापालिका घरगुती वापरासाठी १ हजार लिटरमागे ५ रुपये याप्रमाणे पाणी वापराची देय रक्कम वसूल करते, तर महापालिकेला स्वत:ला मात्र पाण्याकरिता प्रतिहजार लिटर साडेसात रुपये खर्च होतो.जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी ठरविलेल्या धोरणानुसार नाशिकमध्ये सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात दरडोई कपात होणार असून,१५० ऐवजी १३५ लिटर दरडोई पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे कपातीबरोबरच दर वाढणार असल्याने पाणीपुरवठा विभागाची अडचण होणार आहे.राजकीय वरदहस्तापोटी महापालिका प्रशासनापुढे मर्यादा येत आहेत. पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर दुप्पट दंडात्मक कारवाई करावी. थकबाकी वसुलीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पाणीचोरी करणाºयांना जे नेते पाठीशी घालतात, त्यांचे महापालिकेतील पद काढून घेतले पाहिजे. - शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमीसरासरी थकबाकी ४१ कोटी आहे. थकबाकी आणि उद्दिष्ट असे मिळून ६१ कोटीपर्यंत असून, येत्या मार्चअखेरपर्यंत प्रशासन उद्दिष्टापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. ४३ टक्के नॉन बिगर महसुली पाणी आहे, ते प्रत्येक शहरात असतेच.- संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता,पाणीपुरवठा विभाग, मनपा, नाशिकप्रति १ हजार लिटरचे दरघरगुती जोडणी "5बिगर घरगुती जोडणी "22व्यावसायिक जोडणी "27 

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरण