शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
3
अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
4
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
5
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
6
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
7
ZP Election 2026: मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद 
8
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
9
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
10
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
11
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
12
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
13
'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
14
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
15
भयंकर! खेळताना कपडे खराब झाले म्हणून ६ वर्षांच्या लेकीला सावत्र आईने बदडलं; चिमुरडीचा जागीच मृत्यू
16
Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
17
Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
18
Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
19
‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले 
20
३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
Daily Top 2Weekly Top 5

लोका सांगे ब्रह्मज्ञान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:04 IST

आज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे. शहाणपणा करणारे अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले असतात. कोणतीही ...

ठळक मुद्देलोकांना शहाणपणा यावा, असं खरंच वाटंत असेल तर स्वत: तसं वागावंच लागेलआज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे

आज समाजात शहाणपण शिकवणाºयांचा दुष्काळ नाही तर शहाणपणाने वागणाºयांचा दुष्काळ आहे. शहाणपणा करणारे अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले असतात. कोणतीही नवीन गोष्ट आम्हाला माहिती झाली की, आम्ही ती लगेच लोकांना सांगून मोकळे होतो. लोकांनी कसे वागावे, हे आपण अचूक सांगतो; पण तोच शहाणपणा आपल्यावर, वेळ आल्यानंतर आपण करतो का? हाच खरा प्रश्न आहे. सारं जग आम्हाला कळलं, असं उगीच वाटत राहतं. तसं आपण, मला सगळं माहिती आहे, असं बºयाचदा बोलतोही. खरं आहे ज्ञान मुकं असतं तर अज्ञान खूप बोलकं असतं. मला काही कळत नाही, हे एकदा कळलं की, काहीतरी कळायला सुरुवात होते, असं म्हणतात. हे समजून घ्यायचं आज गरज आहे.

अज्ञ माणसं तज्ज्ञापणानं शिकवू लागल्यामुळं सुज्ञपणात काही परिवर्तन होताना दिसत नाही. शिक्षणक्षेत्रात हे नेहमी घडतं. शाळेतील पोरांपुढे उभं न राहणारी अनेक तज्ज्ञ मंडळी अभ्यासक्रम व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठीचे प्रशिक्षण देताना दिसतात. शेतीच्या वास्तवाचे ज्ञान अनुभव नसणारी माणसं पीकपाण्याच्या नियोजनाचा सल्ला देताना दिसतात. खोटं बोलण्याचं अलिखित अभिवचन देत सर्वच पक्ष आपले जाहिरनामे केवळ छापतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाही लोका सांगे ब्रह्मज्ञाऩ़़ अशीच गत होते त्यांची. उक्ती आणि कृतीत आज प्रत्येकात फार मोठा फरक दिसतो. व्यायाम, योगा,योगासने, आरोग्य, मन:शांती, चालणे, फिरणे आदींबाबत तर कोण ? काय ? सांगेल याचा नेम नाही; पण सांंगणाºयांनी खरंच आपण तसं वागतो, करतो का? याचा स्वत:शी प्रामाणिक राहून, पडताळून पाहिलं तर लेख शीर्षक रास्तच वाटेल.

लोकांना शहाणपणा यावा, असं खरंच वाटंत असेल तर स्वत: तसं वागावंच लागेल. मग तुम्ही काही न सांगताही लोक सुधारतील, कारण विचाराला कर्तृत्वाची जोड असल्याशिवाय शब्दाला वजन, उंची येत नाही. लोकांना काही सांगण्याची घाई करु नये. ऊठसूट सल्ले देऊ नयेत़ विचारल्याविना कोणा काही सांगू नये. सांगण्यापूर्वी त्यांच्या साºया परिस्थितीचा सारासार विचार करून माझ्यावर ती वेळ आली तर मी त्यावेळी काय करु शकतो, याचा विचार करावा. आपलं आचरण शुद्ध असलंच पाहिजे, विचार सुंदर असायला हवेत, जगणं निर्मळ असायलाच हवं, तरच लोकांना काही बोध करावा, अन्यथा संयम राखावा.

जाणत्यांनी जरुर मार्गदर्शन करायलाच हवं, कारण तो त्यांचा अधिकार असतो. पण जाणती माणसं या स्वयंसिद्ध ब्रह्मज्ञानी लोकांच्या गर्दीपासून कायम दूर राहतात. यामुळे ज्ञानापेक्षा संभ्रम जास्त निर्माण होतो. त्यामुळे दिशाहीन समाज निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. आजही समाजामध्ये अनेक गोष्टी आम्हाला अट्टाहासाने कराव्या लागतील. अशांतता, अस्वस्थता मिटविण्यासाठी आचरणहीन शब्दांचे बुडबुडे हवेत सोडून देणं बंद करावं लागेल. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणं शिकल्याशिवाय आम्ही स्वस्थ व शांत जीवन जगूच शकत नाही. आजही आम्ही बुवाबाजी, जादूटोण्यावर श्रद्धा ठेवत राहतो. अगदी नरबळीपर्यंत आमची मजल जात आहे. याचं समूळ उच्चाटन व्हायला हवं. ते जाणिवपूर्वक घडायला हवं.. उघड्यावरचे, बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत हे माहीत असतानाही आम्ही खात राहतो.

मुलांनी जसं वागायला हवं वाटतं तसं अगोदर आपणास वागावं लागेल. कारण मुलं आपल्या शब्दापेक्षा कृतीतून अधिक शिकत असतात. म्हणून केवळ तोंडी ब्रह्मज्ञानाचे डोस पाजण्यापेक्षा कडव्या तत्त्वज्ञानाचे आचरण आपण स्वत: करावे, त्याशिवाय मुलांमध्ये अपेक्षित बदल घडताना दिसून येणार नाहीत. वैयक्तिक, सामाजिक, सर्वच पातळीवर माणुसकी हीच जात व मानवता हाच खरा. या न्यायानं वागलं तर काहीतरी सात्विक वर्तनाबद्दल घडू शकेल.

प्रत्येकाने आपला परीघ सुंदर करावा. जीवन कसं असावं याचा वस्तुपाठ बनवावा. तरच आपण चार लोकांना दोन गोष्टी सांगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त करु शकू, अन्यथा सारं पालथ्या घागरीवर पाणी. तेव्हा लोकांना ब्रह्मज्ञान शिकविणे, सांगण्यापूर्वी विचार करा. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडा पाषाण, अशी गत आपली होईल.तेव्हा विचार करु या..- रवींद्र देशमुख, (लेखक शिक्षक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरchildren's dayबालदिन