शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

पोलीस ठाण्यातील लॉकअप धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:10 IST

येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला सुमारे तीन वर्ष होऊनसुद्धा अद्यापपर्यंत मान्यता न मिळाल्याने लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. अद्यापपर्यंत लॉकअपचा प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला सुमारे तीन वर्ष होऊनसुद्धा अद्यापपर्यंत मान्यता न मिळाल्याने लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. अद्यापपर्यंत लॉकअपचा प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.इंदिरानगर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे, संघटना आणि नागरिकांनी आंदोलने करून निवेदने दिली. यानंतर जनतेच्या भावनांची कदर करीत स्वतंत्र पोलीस ठाण्यास मंजुरी देण्यात आली. दि.१ एप्रिल २०१० रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. इंदिरानगरला स्वमालकीची इमारत बांधून तयार नसल्याने तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या एका इमारतीत पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. या पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध विभागास स्वतंत्र व्यवस्था आणि लॉकअपअभावी मोठी गैरसोय होती. त्यामुळे स्वमालकीची जागा शोधत असताना सुमारे ४३ वर्षांपूर्वी पोलीस विभागाच्या मालकीच्या असलेल्या जागेचा शोध २०११ मध्ये लागला. त्यामुळे स्वमालकीच्या जागेत नूतन इमारतीचा प्रश्न मार्गी लागला होता. तसेच नूतन इमारतीत अधिकारी आणि कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि संशयित गुन्हेगारांना भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदी पोलीस ठाण्यात ने-आण करण्याची अडचण दूर होणार होती. पोलीस ठाण्याचे भूमिपूजन करून दीड वर्षांत इमारत पूर्ण करण्यात आली.इ.स. २०१६ मध्ये पोलीस ठाण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तीन वर्षे होऊनसुद्धा अद्यापपर्यंत लॉकअपला मान्यता न मिळाल्याने संशयित गुन्हेगाराला अटक केल्यानंतर चौकशीसाठी ठेवण्यास अडचण निर्माण होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे घडत असतात आणि गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे संशयित गुन्हेगाराला पकडल्यानंतर चौकशीसाठी त्याला अटक करावी लागते. तेव्हा त्याला भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदी ठिकाणी लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी ने-आण करावी लागते. एखादा सराईत गुन्हेगार लॉकअपमध्ये नेताना पळून गेल्यावरच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या लॉकला मान्यता मिळणार आहे का? तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला संबंधित विभागाकडून मान्यता मिळणे गरजेचे आहे.लॉकअप शोभिवंत वस्तूतीन वर्षांपासून पोलीस ठाण्याचे लॉकअप धूळखात पडून आहे. जर मान्यताच द्यायची नव्हती तर लॉकअप बांधून पैसा कशाला खर्च केला? पोलीस ठाण्याचे लॉकअप किती दिवस शोभिवंत वस्तू म्हणून राहणार ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसjailतुरुंग