शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातील लॉकअप धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:10 IST

येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला सुमारे तीन वर्ष होऊनसुद्धा अद्यापपर्यंत मान्यता न मिळाल्याने लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. अद्यापपर्यंत लॉकअपचा प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला सुमारे तीन वर्ष होऊनसुद्धा अद्यापपर्यंत मान्यता न मिळाल्याने लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. अद्यापपर्यंत लॉकअपचा प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.इंदिरानगर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे, संघटना आणि नागरिकांनी आंदोलने करून निवेदने दिली. यानंतर जनतेच्या भावनांची कदर करीत स्वतंत्र पोलीस ठाण्यास मंजुरी देण्यात आली. दि.१ एप्रिल २०१० रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. इंदिरानगरला स्वमालकीची इमारत बांधून तयार नसल्याने तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या एका इमारतीत पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. या पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध विभागास स्वतंत्र व्यवस्था आणि लॉकअपअभावी मोठी गैरसोय होती. त्यामुळे स्वमालकीची जागा शोधत असताना सुमारे ४३ वर्षांपूर्वी पोलीस विभागाच्या मालकीच्या असलेल्या जागेचा शोध २०११ मध्ये लागला. त्यामुळे स्वमालकीच्या जागेत नूतन इमारतीचा प्रश्न मार्गी लागला होता. तसेच नूतन इमारतीत अधिकारी आणि कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि संशयित गुन्हेगारांना भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदी पोलीस ठाण्यात ने-आण करण्याची अडचण दूर होणार होती. पोलीस ठाण्याचे भूमिपूजन करून दीड वर्षांत इमारत पूर्ण करण्यात आली.इ.स. २०१६ मध्ये पोलीस ठाण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तीन वर्षे होऊनसुद्धा अद्यापपर्यंत लॉकअपला मान्यता न मिळाल्याने संशयित गुन्हेगाराला अटक केल्यानंतर चौकशीसाठी ठेवण्यास अडचण निर्माण होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे घडत असतात आणि गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे संशयित गुन्हेगाराला पकडल्यानंतर चौकशीसाठी त्याला अटक करावी लागते. तेव्हा त्याला भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदी ठिकाणी लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी ने-आण करावी लागते. एखादा सराईत गुन्हेगार लॉकअपमध्ये नेताना पळून गेल्यावरच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या लॉकला मान्यता मिळणार आहे का? तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला संबंधित विभागाकडून मान्यता मिळणे गरजेचे आहे.लॉकअप शोभिवंत वस्तूतीन वर्षांपासून पोलीस ठाण्याचे लॉकअप धूळखात पडून आहे. जर मान्यताच द्यायची नव्हती तर लॉकअप बांधून पैसा कशाला खर्च केला? पोलीस ठाण्याचे लॉकअप किती दिवस शोभिवंत वस्तू म्हणून राहणार ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसjailतुरुंग