शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन, संचारबंदीमुळे वाढते आहे. नैराश्य: मानसोपचारतज्ज्ञ हेमंत सोननीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:49 IST

नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली.

ठळक मुद्देसमुपदेशन महत्वाचेकुटूंबासमवेत चांगला वेळ घालवा

नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली. इंडियन मेडीकल असोसिएशनचे नियोजीत अध्यक्ष असलेल्या डॉ. सोननीस यांनी सद्य स्थितीवर नागरीकांच्या असलेल्या मानसिकतेबाबत लोकमतला माहिती दिली.

प्रश्न: देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी त्यामुळे नागरीक चिंतेत आहेत. त्यातच अनेकांना लॉकडाऊन नंतरच्या बंदीची भीती वाटत आहे. त्याबाबत काय स्थिती आहे?डॉ. सोननीस: कोरोनाच्या जागतिक संकटामुळे भीषण स्थिती निर्र्माण झाली आहे. विशेषत: लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे तर नागरीक धास्तावले आहेत. याशिवाय आपल्या भागात आणि अन्यत्रही कोरोना बाधीतांची माहिती मिळाल्यानंतर नागरीक पॅनीक होत आहेत. अनेकांना भविष्याची चिंता सतावते आहे. त्यातून नैराश्य वाढु लागल्याचे दिसत आहे. यासंदर्भात अनेक नागरीकांचे मानसोपचार तज्ज्ञांकडे फोन येत आहेत. त्यांचे समुपदेशन आम्ही करत आहोत. याशिवाय अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी बºया केलेल्या रूग्णांच्या मनस्थितीवर देखील या सर्व परिस्थतीचा परीणाम होत आहे. त्यामुळे त्यांचे देखील आता फोन येऊ लागले आहेत.

प्रश्न: राज्यभरात अशाप्रकारे स्थिी असेल तर काय करावे?

डॉ. सोननीस: सध्या सर्वत्र मानसिक स्थिती अशी जाणवते. त्यामुळे राज्यस्तरावर मानसोपचार संघटनेच्या वतीने नागरीकांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. काही तज्ज्ञांचे नंबर आम्ही जाहिर केले असून त्यावर येणाºया नागरीकांच्या फोनवर समर्पक समुपदेशन केले जाते.

प्रश्न: एरवी कुटूंबासोबत वेळ देता येत नाही असे सांगणारे अनेक नागरीक आता मात्र वेळ कसा घालवावा याबाबत प्रश्न करताना दिसतात.डॉ. सोननीस: हे खरे आहे. मात्र आता कुटूंबासाठी वेळ देताना आणखी दिवसभरात काय करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. त्यामुळे अनेक जण टाईमपास करतात. वेळ घालवण्यासाठी वॉटस अ‍ॅप किंवा फेसबुक तास न तास बघितला म्हणजे वेळ सत्कारणी लागत नाही. त्यातून काही साध्य होत नाही. त्यासाठी ग् ाुणवत्तेपूर्ण वेळ घालवला पाहिेजे.म्हणजे ब-याच गोष्टी आपल्याला दैनंदिन धावपळीमुळे करता येत नाही. अशा गोष्टी केल्या पाहिजेत. युट्यूब वरून काही चांगले व्यायामाचे व्हीडीओ बघून व्यायाम करायचा असेल तर तेही केले पाहिजे. काहींना गाण्याची आवड असते परंतु वेळ मिळत नाही. त्यामुळे गाणे शिकून एखादा व्हीडीओ तयार करून तो युट्यूब वर टाकता येऊ शकतो. शिकण्यासारख्या किंवा करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात त्या या कालावधीत करता येऊ शकतात. आपले अनेक नातेवाईक ज्या चांगल्या गोष्टी करीत असतील त्या आपण आपल्या घरात करू शकतो. त्यामुळे वेळ घालवा परंतु तो टाईम पास असता कामा नये तर त्यातून काही तरी सकारात्मक निघाले पाहीजे म्हणजे गुणवत्तापुर्ण वेळ घालवला पाहिजे.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याMental Health Tipsमानसिक आरोग्य