शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:31 IST

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट आणि कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे शहरी भागातील नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालीआहे. किरकोळ बाजारात गिºहाईक खरेदीला जात नसल्याचा मोठा फटकादेखील कांदे खरेदीवर झाला असून, कांद्याची मागणी घटली आहे, त्यामुळे व्यापारी कमी दरात कांदा खरेदी करीत असल्याने त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने मागणी घटली

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट आणि कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे शहरी भागातील नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालीआहे. किरकोळ बाजारात गिºहाईक खरेदीला जात नसल्याचा मोठा फटकादेखील कांदे खरेदीवर झाला असून, कांद्याची मागणी घटली आहे, त्यामुळे व्यापारी कमी दरात कांदा खरेदी करीत असल्याने त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.शहरी भागात मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांचा तुटवडा असल्याने कांद्याच्या दरात बरीच प्रमाणात घसरण होत आहे. मागील दोन महिन्यांत सलग कांद्याचे दर कोसळत राहिल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.मार्च महिन्यात कांद्याला चौदाशे ते पंधराशे रु पये प्रतिक्विंटलला दर मिळत होता. या दरात शेतकºयांना चांगले दोन पैसे मिळत होते. २२ मार्चपासून सुरू झालेल्या जनता कर्फ्यू आणि त्यानंतर सलग सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील बंद असलेले रेस्टॉरंट, हॉटेल आणि नाश्ता सेंटरमध्ये कांद्याची मागणी घटली आणि मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या बाजारभावात सतत घसरण होत राहिली. नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे लासलगाव आणि पिंपळगाव, सायखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी साडेसहाशे ते सातशे रु पये दर महिनाभरात मिळाला आहे. उन्हाळ्यातील साठवणूक केलेल्या कांद्याला किमान दोन हजार रु पये प्रतिक्विंटल दर मिळण्याची अपेक्षा शेतकºयांना होती, मात्र अवघ्या सहाशे ते सातशे रु पये पर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळत असल्याने शेतकºयांचा कांदा साठवणुकीचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने मोठा फटका बसला आहे.उन्हाळ कांद्याची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणामध्ये साठवणूक केली होती, मात्र जून महिन्यातच जोरदार पावसाला सुरु वात झाल्याने पावसामुळे साठवणूक केलेला कांदा टिकणार नाही, अशी चिन्हे दिसत असल्याने शेतकºयांनी लवकरच उन्हाळ कांदा विक्र ीसाठी बाजारात दाखल केला, मात्र शहरी भागातून येणाºया व्यापाºयांची संख्या घटली आहे. कांद्याला किरकोळ बाजारात मागणी नसल्याने व्यापाºयांकडून बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी केला जात नाही.कोरोनापूर्व काळात मुंबई, ठाणे, आणि आसपासच्या परिसरात दररोज किमान १०० ते १२० गाड्या इतका कांदा लागत असे. बटाट्याची मागणीही ६० ते ७० गाड्या इतकी असे. नाशिक जिल्ह्यातून आवक होण्याचे हे प्रमाण कायम राहिले तर मुंबईत कांदा, बटाट्याचे दर वाढत नाहीत असा यापूर्वीचा अनुभव आहे. महानगर क्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट चालक किमान ४० ते ५० गाड्या कांदा खरेदी करीत. आता ही रोजची खरेदी थंडावली आहे. दिवसाला कांद्याने भरलेल्या जेमतेम ३० गाड्या या बाजारात येत असून, त्यानंतरही दर घटले आहेत.कोरोना रोगाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकºयांना बसला असून, मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या मागणीत घट झाल्याने बाजारभावात घट झाली आहे. खर्चही वसूल होत नसल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याला पंधराशे ते दोन हजार रु पये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.हॉटेल व्यवसायात ग्राहकांच्या मागणीनुसार कांदा कोणत्याही दरात त्यांना पुरवठा करावा लागतो. हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला मागणी असते, लॉकडाऊन सुरू असल्याने मार्च महिन्यापासून हॉटेल व्यवसाय बंद आहेत. हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे गिºहाईक येत नसल्याने कांदा खरेदी बंद आहे. याचा परिणाम नक्कीच कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे.- विकास भागवत, हॉटेल व्यावसायिक.शहरी भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या खरेदीत मोठी घट झाली आहे. किरकोळ कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहक घराबाहेर पडत नाही. शहरी भागातील लोक रस्त्यावर आणि बाजारात येत नसल्याने त्याचा प्रत्यक्ष फटका कांद्याचा बाजारभावावर झाला आहे. मागणी नसल्याने कांद्याला उठाव नाही, त्यामुळे दरही पुरेसा मिळत नाही.-अनंत भुतडा, कांदा व्यापारी, सायखेडा. 

टॅग्स :onlineऑनलाइनMarket Yardमार्केट यार्ड