शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

श्रीक्षेत्र केदारनाथ येथील मंदिर जीर्णोद्धाराचे त्र्यंबकेश्वरला थेट प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 00:15 IST

त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारतातील बारा ज्योतिर्लिंगासह ८२ ठिकाणी दाखविण्यात आले.

ठळक मुद्देआद्य शंकराचार्यांच्या समाधी, मूर्ती अनावरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारतातील बारा ज्योतिर्लिंगासह ८२ ठिकाणी दाखविण्यात आले.त्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे मंडप उभारण्यात येऊन तेथे भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण दाखविण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते.आद्य शंकराचार्य यांची समाधी व मूर्तीचा अनावरण सोहळा पाहण्याचे व त्यात सहभागी होण्याचे भाग्यही मला लाभले. मी स्वत:ला भाग्यशाली समजतो, असे हा सोहळा संपन्न झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.राज्य सरकारने दहा-बारा रुपये कमी करावेतकेंद्राने पेट्रोल, डिझेलचे भाव पाच रुपयांनी उतरवले, राज्यात त्याची अंमलबजावणी होईल का? असे विचारताच फडणवीस यांनी त्यावर का नाही होणार? केंद्राने भाव उतरवले तर आपोआप राज्यात भाव कमी होतील. आणि राज्य सरकारने दहा-बारा रुपये कमी करावेत, असे ते म्हणाले.सन २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये भूकंप, भूस्खलन व बर्फ वितळून जी नैसर्गिक आपत्ती ज्योतिर्लिंग केदारनाथ मंदिर व परिसरावर आली होती. त्यावेळेस केदारनाथ मंदिराजवळ असलेल्या आद्य शंकराचार्य समाधी व मूर्तीदेखील या नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाल्या होत्या. प्रधानमंत्री मोदी यांनी वैभव संपन्न केदारनाथ मंदिर व आद्य शंकराचार्य समाधी व मूर्ती पुनश्च जैसे थे तयार करून या स्थळाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ असा निश्चय त्यांनी केला होता तो पुर्णत्वास आल्याचे फडणवीस म्हणाले.यावेळी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात त्र्यंबकेश्वरमधील सर्व आखाड्यांचे साधू, संत, महंत, ठाणापती व मान्यवर अतिथी थेट प्रक्षेपण पाहात होते.त्र्यंबकेश्वर येथील थेट प्रक्षेपण प्रसंगी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुनील बच्छाव त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सायली शिखरे, स्वप्निल शेलार, समीर पाटणकर, विष्णू दोबाडे, दीपक लोणारी, अशोक घागरे, हर्षल शिखरे, नितीन रामायणे, शिल्पा रामायणे, सागर उजे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस