शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

ललित साहित्यावर शाब्दिक जुगलबंदी

By admin | Updated: September 29, 2014 00:24 IST

परिसंवाद : ललित साहित्याच्या आवश्यकतेला कौल

नाशिक : जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे आणि ललित साहित्याशी समाजाचे नाते जन्मजन्मांतरीचे असल्याचा सूर ललित साहित्याचे समर्थक लावत असताना, ललित साहित्याची समाजाला तिळमात्र गरज नाही आणि खांडेकर-फडके वाचून सामान्य माणसाची दुपारची भूक काही भागणार नाही, असा हल्ला विरोधकांनी चढविला. सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात रंगतदार ठरलेल्या परिसंवादात शाब्दिक जुगलबंदी झडल्यानंतर अध्यक्ष असलेल्या प्रा. दिलीप धोंडगे यांनी कास्टिंग व्होटचा वापर करत ललित साहित्याच्या बाजूने कौल दिला.सावानाच्या साहित्यिक मेळाव्यात डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवादात ‘समाजाला ललित साहित्याची गरज नाही’ या विषयावर प्रा. अनंत येवलेकर, अभय सदावर्ते, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आपआपली मते मांडली. कवी किशोर पाठक यांनी समन्वयकाची भूमिका निभावली. प्रा. अनंत येवलेकर यांनी बीजभाषण करताना सांगितले, लालित्य हे ईश्वरासारखे असते. ते दाखवता येत नाही. जोवर फुलांना वास आहे तोवर ललित साहित्याची समाजाला गरज भासणारच आहे. जे खपले जात नाही, वाचले जात नाही म्हणून त्याची समाजाला गरज नाही, हे त्रैराशिक मांडले जाते ते तितकेसे खरे नाही. काही ललितकृती दिशाभूल करतात; पण जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे. अभय सदावर्ते यांनी बीजभाषकावरच प्रहार करत भुसभुशीत मांडणीवर आक्षेप घेतले. तुमची इयत्ता तपासून पहा, असा सल्लाही देण्यात आला. जे उत्स्फूर्त आहे ते नक्कीच वाचले जाईल. ललित साहित्याला कसलाही आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी ललित साहित्याला अच्छे दिन आले असल्याचे सांगत त्याचे डबके झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनीही ललित साहित्य जगण्याला भिडत नसल्याचे सांगत नवे लेखनबंध विकसित करण्याची कल्पना मांडली. ललित लेखकाला कुणी किंमत देत नाही. त्यामुळे जे भावेल ते बेधडक लिहा, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. याचवेळी शं. क. कापडणीस, अपर्णा वेलणकर, स्वानंद बेदरकर, सुनील देशपांडे, मिलिंद जहागीरदार व चंद्रकांत महामिने यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला. परिसंवादाचा समारोप करताना प्राचार्य दिलीप धोंडगे म्हणाले, अवघा समाज हा साहित्योकुजीवी आहे. समाजाला संघटित करण्याचे आणि मूल्य टिकवून ठेवण्याचे काम साहित्य करत असते. साहित्य हे जगण्याची प्रबळ ऊर्मी, प्रेरणा निर्माण करते. ललितबंधातूनच ते उत्तम रीतीने प्रकट होते. ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि तुकोबाच्या अभंगांचा आजही आधार घेतला जातो. ललित साहित्याचे सामर्थ्य त्यात आहे. साहित्य हे जीवनदर्शनाचे काम करते. त्यामुळे समाजाला ललित साहित्याची गरज असल्याचेही धोंडगे यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)