शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

ललित साहित्यावर शाब्दिक जुगलबंदी

By admin | Updated: September 29, 2014 00:24 IST

परिसंवाद : ललित साहित्याच्या आवश्यकतेला कौल

नाशिक : जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे आणि ललित साहित्याशी समाजाचे नाते जन्मजन्मांतरीचे असल्याचा सूर ललित साहित्याचे समर्थक लावत असताना, ललित साहित्याची समाजाला तिळमात्र गरज नाही आणि खांडेकर-फडके वाचून सामान्य माणसाची दुपारची भूक काही भागणार नाही, असा हल्ला विरोधकांनी चढविला. सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात रंगतदार ठरलेल्या परिसंवादात शाब्दिक जुगलबंदी झडल्यानंतर अध्यक्ष असलेल्या प्रा. दिलीप धोंडगे यांनी कास्टिंग व्होटचा वापर करत ललित साहित्याच्या बाजूने कौल दिला.सावानाच्या साहित्यिक मेळाव्यात डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवादात ‘समाजाला ललित साहित्याची गरज नाही’ या विषयावर प्रा. अनंत येवलेकर, अभय सदावर्ते, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी आपआपली मते मांडली. कवी किशोर पाठक यांनी समन्वयकाची भूमिका निभावली. प्रा. अनंत येवलेकर यांनी बीजभाषण करताना सांगितले, लालित्य हे ईश्वरासारखे असते. ते दाखवता येत नाही. जोवर फुलांना वास आहे तोवर ललित साहित्याची समाजाला गरज भासणारच आहे. जे खपले जात नाही, वाचले जात नाही म्हणून त्याची समाजाला गरज नाही, हे त्रैराशिक मांडले जाते ते तितकेसे खरे नाही. काही ललितकृती दिशाभूल करतात; पण जगण्याला भिडण्याची ताकद ललित साहित्यात आहे. अभय सदावर्ते यांनी बीजभाषकावरच प्रहार करत भुसभुशीत मांडणीवर आक्षेप घेतले. तुमची इयत्ता तपासून पहा, असा सल्लाही देण्यात आला. जे उत्स्फूर्त आहे ते नक्कीच वाचले जाईल. ललित साहित्याला कसलाही आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी ललित साहित्याला अच्छे दिन आले असल्याचे सांगत त्याचे डबके झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनीही ललित साहित्य जगण्याला भिडत नसल्याचे सांगत नवे लेखनबंध विकसित करण्याची कल्पना मांडली. ललित लेखकाला कुणी किंमत देत नाही. त्यामुळे जे भावेल ते बेधडक लिहा, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. याचवेळी शं. क. कापडणीस, अपर्णा वेलणकर, स्वानंद बेदरकर, सुनील देशपांडे, मिलिंद जहागीरदार व चंद्रकांत महामिने यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला. परिसंवादाचा समारोप करताना प्राचार्य दिलीप धोंडगे म्हणाले, अवघा समाज हा साहित्योकुजीवी आहे. समाजाला संघटित करण्याचे आणि मूल्य टिकवून ठेवण्याचे काम साहित्य करत असते. साहित्य हे जगण्याची प्रबळ ऊर्मी, प्रेरणा निर्माण करते. ललितबंधातूनच ते उत्तम रीतीने प्रकट होते. ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि तुकोबाच्या अभंगांचा आजही आधार घेतला जातो. ललित साहित्याचे सामर्थ्य त्यात आहे. साहित्य हे जीवनदर्शनाचे काम करते. त्यामुळे समाजाला ललित साहित्याची गरज असल्याचेही धोंडगे यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)