शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

नाशिककरांनो, सावध ऐका, पुढल्या हाका...!

By admin | Updated: September 17, 2015 00:02 IST

पिण्याच्या पाण्याचा मुक्त वापर, बेफिकिरीमुळे टंचाईचे संकट होणार गडद

नाशिक : पावसाने दिलेली ओढ, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६४ टक्के पाणीसाठा, सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीने पाणीपुरवठ्यावर येणारा ताण, शाहीस्नानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाणीसाठ्यातून आतापर्यंत झालेला २४३ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग आणि दैनंदिन सुमारे २८ ते ३० टक्के पाणीगळती, या साऱ्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना भविष्यातील पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पाणीवापराबाबत अजूनही नाशिककर बेफिकीर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ‘शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरी’ या मानसिकतेत गुरफटलेल्या नाशिककरांनी पुढल्या संकटाच्या हाका सावध होऊन ऐकल्या नाहीत तर पाणीटंचाईचे ढग गडद होत जातील आणि एकवेळ पाणीकपातीची चाललेली तयारी कदाचित दिवसाआडही होऊ शकते.नाशिक शहर आणि पाणीटंचाई, अशी परिस्थिती अपवादानेच उद्भवली असणार. ‘आम्ही नाशिककर पाण्याबाबत खूप सुखी’, असे आप्त-नातलगांना सांगणाऱ्या नागरिकांना पाण्याचा बेसुमार वापर करण्याची सवयच जडली आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण आणि दारणा नदीवरील चेहडी बंधारा येथून पाणीपुरवठा केला जातो. साधारणपणे महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ३६० ते ३७५ तर चेहडी बंधाऱ्यातून सुमारे ३५ दशलक्ष लिटर याप्रमाणे एकूण सुमारे ३९५ ते ४०५ दशलक्ष लिटर पाणी पिण्यासाठी उचलले जाते. शहरातील ८५ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरात सुमारे १ लाख ६५ हजार नळजोडण्या महापालिकेमार्फत देण्यात आल्या आहेत. जुने नाशिक, पंचवटी यांसारख्या भागात अनेक ठिकाणी जलवाहिन्या तीन ते चार दशकापूर्वी टाकण्यात आल्या असल्याने त्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यातच गेल्या सहा-आठ महिन्यात पाइपलाइन फुटण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने पाणीगळतीचे प्रमाणही वाढते आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात ३५८२ दशलक्ष घनफूट म्हणजे ६४ टक्के पाणीसाठा आहे. (मागील वर्षी याच दरम्यान ९३ टक्के पाणीसाठा होता) गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणात ४५ तर गौतमी-गोदावरीत ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १ जून ते १६ सप्टेंबर या दरम्यान नाशिक तालुक्यात सरासरीच्या ७५ टक्के तर ज्या तालुक्यातील पावसावर गंगापूर धरणाचा पाणीसाठा अवलंबून आहे, त्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघा ३८ टक्के पाऊस झालेला आहे. पावसाने शहरात अधूनमधून हजेरी लावली असली तरी धरणातील पाणीसाठ्यात त्यामुळे खूप मोठी वाढ होऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा वैश्विक पातळीवरचा धर्मसोहळा सुरू आहे. कुंभमेळ्यातील तीनही शाही पर्वणींसाठी जिल्हा प्रशासनाने ५४० दशलक्ष घनफूट इतके पाणी राखीव ठेवले आहे. आतापर्यंत दोन्ही पर्वणी आणि इतरवेळी सुमारे २४३.५ दशलक्ष घनफूट इतके पाणी गोदावरीला सोडण्यात आले आहे. आणखी १०० ते १२० दशलक्ष घनफूट पाणी शुक्रवारी (दि.१८) होणाऱ्या अखेरच्या पर्वणीसाठी सोडले जाईल. तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये सुमारे ३ लाखाहून अधिक साधू व भाविकांचे वास्तव्य असल्याने महापालिकेला त्याठिकाणी २४ तास पाणीपुरवठा करावा लागतो. याशिवाय दरदिवशी गोदास्नानासाठी येणाऱ्या भाविकांचाही ताण वाढतोच आहे. पावसाळा आता अंतिम चरणात येऊन पोहोचला आहे. सप्टेंबर अखेर पाऊस परतीच्या वाटेवर असताना अद्याप गंगापूर धरणातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे ९० टक्क्यांवर जाऊन पोहोचलेला नाही. सद्यस्थितीतील वातावरण पाहता मोठ्या पावसाची चिन्हेही दिसून येत नाहीत. हवामान खात्याचेही अंदाज काळजाचे ठोके वाढवत आहे. अशा स्थितीत नाशिककरांनी पाणीवापराबाबत स्वयंस्फूर्तीने काही निर्बंध लादून घेणे गरजेचे आहे. परंतु, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अजूनही नाशिककर पाणीवापरावाबत बेफिकीर असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)