शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनो, सावध ऐका, पुढल्या हाका...!

By admin | Updated: September 17, 2015 00:02 IST

पिण्याच्या पाण्याचा मुक्त वापर, बेफिकिरीमुळे टंचाईचे संकट होणार गडद

नाशिक : पावसाने दिलेली ओढ, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६४ टक्के पाणीसाठा, सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीने पाणीपुरवठ्यावर येणारा ताण, शाहीस्नानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाणीसाठ्यातून आतापर्यंत झालेला २४३ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग आणि दैनंदिन सुमारे २८ ते ३० टक्के पाणीगळती, या साऱ्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना भविष्यातील पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पाणीवापराबाबत अजूनही नाशिककर बेफिकीर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ‘शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरी’ या मानसिकतेत गुरफटलेल्या नाशिककरांनी पुढल्या संकटाच्या हाका सावध होऊन ऐकल्या नाहीत तर पाणीटंचाईचे ढग गडद होत जातील आणि एकवेळ पाणीकपातीची चाललेली तयारी कदाचित दिवसाआडही होऊ शकते.नाशिक शहर आणि पाणीटंचाई, अशी परिस्थिती अपवादानेच उद्भवली असणार. ‘आम्ही नाशिककर पाण्याबाबत खूप सुखी’, असे आप्त-नातलगांना सांगणाऱ्या नागरिकांना पाण्याचा बेसुमार वापर करण्याची सवयच जडली आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण आणि दारणा नदीवरील चेहडी बंधारा येथून पाणीपुरवठा केला जातो. साधारणपणे महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ३६० ते ३७५ तर चेहडी बंधाऱ्यातून सुमारे ३५ दशलक्ष लिटर याप्रमाणे एकूण सुमारे ३९५ ते ४०५ दशलक्ष लिटर पाणी पिण्यासाठी उचलले जाते. शहरातील ८५ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरात सुमारे १ लाख ६५ हजार नळजोडण्या महापालिकेमार्फत देण्यात आल्या आहेत. जुने नाशिक, पंचवटी यांसारख्या भागात अनेक ठिकाणी जलवाहिन्या तीन ते चार दशकापूर्वी टाकण्यात आल्या असल्याने त्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यातच गेल्या सहा-आठ महिन्यात पाइपलाइन फुटण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने पाणीगळतीचे प्रमाणही वाढते आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात ३५८२ दशलक्ष घनफूट म्हणजे ६४ टक्के पाणीसाठा आहे. (मागील वर्षी याच दरम्यान ९३ टक्के पाणीसाठा होता) गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणात ४५ तर गौतमी-गोदावरीत ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १ जून ते १६ सप्टेंबर या दरम्यान नाशिक तालुक्यात सरासरीच्या ७५ टक्के तर ज्या तालुक्यातील पावसावर गंगापूर धरणाचा पाणीसाठा अवलंबून आहे, त्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघा ३८ टक्के पाऊस झालेला आहे. पावसाने शहरात अधूनमधून हजेरी लावली असली तरी धरणातील पाणीसाठ्यात त्यामुळे खूप मोठी वाढ होऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा वैश्विक पातळीवरचा धर्मसोहळा सुरू आहे. कुंभमेळ्यातील तीनही शाही पर्वणींसाठी जिल्हा प्रशासनाने ५४० दशलक्ष घनफूट इतके पाणी राखीव ठेवले आहे. आतापर्यंत दोन्ही पर्वणी आणि इतरवेळी सुमारे २४३.५ दशलक्ष घनफूट इतके पाणी गोदावरीला सोडण्यात आले आहे. आणखी १०० ते १२० दशलक्ष घनफूट पाणी शुक्रवारी (दि.१८) होणाऱ्या अखेरच्या पर्वणीसाठी सोडले जाईल. तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये सुमारे ३ लाखाहून अधिक साधू व भाविकांचे वास्तव्य असल्याने महापालिकेला त्याठिकाणी २४ तास पाणीपुरवठा करावा लागतो. याशिवाय दरदिवशी गोदास्नानासाठी येणाऱ्या भाविकांचाही ताण वाढतोच आहे. पावसाळा आता अंतिम चरणात येऊन पोहोचला आहे. सप्टेंबर अखेर पाऊस परतीच्या वाटेवर असताना अद्याप गंगापूर धरणातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे ९० टक्क्यांवर जाऊन पोहोचलेला नाही. सद्यस्थितीतील वातावरण पाहता मोठ्या पावसाची चिन्हेही दिसून येत नाहीत. हवामान खात्याचेही अंदाज काळजाचे ठोके वाढवत आहे. अशा स्थितीत नाशिककरांनी पाणीवापराबाबत स्वयंस्फूर्तीने काही निर्बंध लादून घेणे गरजेचे आहे. परंतु, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अजूनही नाशिककर पाणीवापरावाबत बेफिकीर असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)