शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वीज पोहोचविण्यासाठी पोस्टमन बनणार दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:27 IST

भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देशोभा मधाळे : दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन करणार सर्वेक्षण

नाशिक : भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.नाशिक टपाल विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय टपाल तिकीट संग्रहाच्या प्रदर्शनानिमित्त मधाळ या शहरात आल्या आहेत. शनिवारी (दि.२०) महात्मा फुले कलादालनात प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, देशात अशी कुठलीही जागा शिल्लक नाही, जेथे टपाल खाते पोहोचलेले नाही, त्यामुळे टपालाच्या संपर्क जाळ्याचा वापर केंद्रीय ऊर्जा विभागाकडून केला जाणार आहे. देशातील कानाकोपऱ्यात वीज पोहोचावी आणि जनतेच्या प्रगतीच्या वाटा उजळून निघाव्या, या उद्देशाने ऊर्जा विभागाला टपाल विभाग महत्त्वाचे सहकार्य करणार आहे. त्यादृष्टीने पोस्टमन ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचा उपक्रम राबविणार आहे. हा उपक्रम पुढील वर्षअखेर पूर्णत्वास येणार असल्याचे मधाळ यांनी सांगितले. राष्टÑ उभारणीच्या कार्यात टपाल विभाग नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.वीज सर्वेक्षण मोहिमेसाठी टपाल विभागाची करण्यात आलेली निवड ही सुवर्ण संधी समजून प्रत्येक पोस्टमन त्यासाठी योगदान देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.टपाल खात्याकडूनही ‘डिजिटल’चा स्वीकारकाळानुरूप टपाल विभागाने कात टाकली आहे. संदेशवहनाची विविध माध्यमे आधुनिकतेच्या काळात उदयास आल्यानंतर टपालाचे महत्त्व कमी होईल, असे बोलले जात होते; मात्र या काळात टपाल विभागाचे महत्त्व व जबाबदारी अधिकाधिक वाढली आहे.च्इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक असो अथवा केंद्र सरकारच्या विविध योजनांचा कारभार असो, टपाल विभाग नागरिकांपर्यंत सुरळीतपणे पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘दर्पण’ योजनेद्वारे ग्रामीण भागातील टपालाची उप कार्यालये, शाखा कार्यालयदेखील लवकरच डिजिटल होणार असल्याचे शोभा मधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिकelectricityवीज