शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वीज पोहोचविण्यासाठी पोस्टमन बनणार दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:27 IST

भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देशोभा मधाळे : दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन करणार सर्वेक्षण

नाशिक : भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.नाशिक टपाल विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय टपाल तिकीट संग्रहाच्या प्रदर्शनानिमित्त मधाळ या शहरात आल्या आहेत. शनिवारी (दि.२०) महात्मा फुले कलादालनात प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, देशात अशी कुठलीही जागा शिल्लक नाही, जेथे टपाल खाते पोहोचलेले नाही, त्यामुळे टपालाच्या संपर्क जाळ्याचा वापर केंद्रीय ऊर्जा विभागाकडून केला जाणार आहे. देशातील कानाकोपऱ्यात वीज पोहोचावी आणि जनतेच्या प्रगतीच्या वाटा उजळून निघाव्या, या उद्देशाने ऊर्जा विभागाला टपाल विभाग महत्त्वाचे सहकार्य करणार आहे. त्यादृष्टीने पोस्टमन ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचा उपक्रम राबविणार आहे. हा उपक्रम पुढील वर्षअखेर पूर्णत्वास येणार असल्याचे मधाळ यांनी सांगितले. राष्टÑ उभारणीच्या कार्यात टपाल विभाग नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.वीज सर्वेक्षण मोहिमेसाठी टपाल विभागाची करण्यात आलेली निवड ही सुवर्ण संधी समजून प्रत्येक पोस्टमन त्यासाठी योगदान देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.टपाल खात्याकडूनही ‘डिजिटल’चा स्वीकारकाळानुरूप टपाल विभागाने कात टाकली आहे. संदेशवहनाची विविध माध्यमे आधुनिकतेच्या काळात उदयास आल्यानंतर टपालाचे महत्त्व कमी होईल, असे बोलले जात होते; मात्र या काळात टपाल विभागाचे महत्त्व व जबाबदारी अधिकाधिक वाढली आहे.च्इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक असो अथवा केंद्र सरकारच्या विविध योजनांचा कारभार असो, टपाल विभाग नागरिकांपर्यंत सुरळीतपणे पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘दर्पण’ योजनेद्वारे ग्रामीण भागातील टपालाची उप कार्यालये, शाखा कार्यालयदेखील लवकरच डिजिटल होणार असल्याचे शोभा मधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिकelectricityवीज