शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

वीज पोहोचविण्यासाठी पोस्टमन बनणार दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:27 IST

भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देशोभा मधाळे : दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन करणार सर्वेक्षण

नाशिक : भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.नाशिक टपाल विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय टपाल तिकीट संग्रहाच्या प्रदर्शनानिमित्त मधाळ या शहरात आल्या आहेत. शनिवारी (दि.२०) महात्मा फुले कलादालनात प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, देशात अशी कुठलीही जागा शिल्लक नाही, जेथे टपाल खाते पोहोचलेले नाही, त्यामुळे टपालाच्या संपर्क जाळ्याचा वापर केंद्रीय ऊर्जा विभागाकडून केला जाणार आहे. देशातील कानाकोपऱ्यात वीज पोहोचावी आणि जनतेच्या प्रगतीच्या वाटा उजळून निघाव्या, या उद्देशाने ऊर्जा विभागाला टपाल विभाग महत्त्वाचे सहकार्य करणार आहे. त्यादृष्टीने पोस्टमन ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचा उपक्रम राबविणार आहे. हा उपक्रम पुढील वर्षअखेर पूर्णत्वास येणार असल्याचे मधाळ यांनी सांगितले. राष्टÑ उभारणीच्या कार्यात टपाल विभाग नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.वीज सर्वेक्षण मोहिमेसाठी टपाल विभागाची करण्यात आलेली निवड ही सुवर्ण संधी समजून प्रत्येक पोस्टमन त्यासाठी योगदान देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.टपाल खात्याकडूनही ‘डिजिटल’चा स्वीकारकाळानुरूप टपाल विभागाने कात टाकली आहे. संदेशवहनाची विविध माध्यमे आधुनिकतेच्या काळात उदयास आल्यानंतर टपालाचे महत्त्व कमी होईल, असे बोलले जात होते; मात्र या काळात टपाल विभागाचे महत्त्व व जबाबदारी अधिकाधिक वाढली आहे.च्इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक असो अथवा केंद्र सरकारच्या विविध योजनांचा कारभार असो, टपाल विभाग नागरिकांपर्यंत सुरळीतपणे पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘दर्पण’ योजनेद्वारे ग्रामीण भागातील टपालाची उप कार्यालये, शाखा कार्यालयदेखील लवकरच डिजिटल होणार असल्याचे शोभा मधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिकelectricityवीज