शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:40 IST

नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला असून, शनिवारी दिंडोरी आणि इगतपुरी येथे झालेल्या वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देजखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला असून, शनिवारी दिंडोरी आणि इगतपुरी येथे झालेल्या वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला.दिंडोरी तालुक्याला पुन्हा झोडपून काढले आहे. शनिवारी श्रीरामनगर येथे अंगावर वीज पडून यमुनाबाई निवृत्ती गांगुर्डे ठार झाल्या. गांडोळे येथील घटनेत सुनीता भोये गंभीर जखमी झाल्या आहेत.इगतपुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हिराबाई कारभारी सदगीर (४७) रा. तळेगाव बुद्रुक या शेतात गुरे चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. याबाबत त्यांचे पती कारभारी सदगीर यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत भरत भाऊराव भले (४०) रा. बारशिंगवे यांच्याही अंगावर वीज पडल्याने ते ठार झाले. परतीच्या पावसाने तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाºयासह हजेरी लावली. पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात