शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चला वसुंधरेचे जतन करू या ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 14:40 IST

हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १४ जानेवारीपासून दिवसाचा कालावधी वाढत जातो. कारण पृथ्वीचा उत्तर धु्रव हा सुर्याकडे हळूहळू झुकण्यास प्रारंभ होतो. जो थेट २१ जूनपर्यंत पृथ्वीचा उत्तर धु्रव हा २३ अंशाने सुर्याकडे झुकलेला असतो. म्हणून भौगोलिकदृष्ट्या २२ डिसेंबर ते १४ जानेवारी हा काळ महत्वाचा ठरतो. ह्या काळात १४ जानेवारी भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक भूगोल दिनानिमित्त...डिसेंबरपासून पृथ्वीचे उत्तरायन सुरू झाले असून, आपल्या हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १४ जानेवारीपासून दिवसाचा कालावधी वाढत जातो. कारण पृथ्वीचा उत्तर धु्रव हा सुर्याकडे हळूहळू झुकण्यास प्रारंभ होतो. जो थेट २१ जूनपर्यंत पृथ्वीचा उत्तर धु्रव हा २३ अंशाने सुर्याकडे झुकलेला असतो. म्हणून भौगोलिकदृष्ट्या २२ डिसेंबर ते १४ जानेवारी हा काळ महत्वाचा ठरतो. ह्या काळात १४ जानेवारी भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. या कालावधीत अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भौगोलिक प्रदर्शन, भौगोलिक सहली, चर्चासत्रे, नकाशावाचन, वृक्षारोपण या सारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु असे उपक्रम घेवून काय साध्य होणार आहे? त्यासाठी समाजाने आपण राहतो त्या भू-गोलासंबंधी म्हणजे पृथ्वीसंबंधी अधिक जागृक होऊन पृथ्वीच्या म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.भूगोलाला सर्व शास्त्रांची जननी म्हटले जाते आणि म्हणूनच पर्यावरणाचे आजचे जे जिवंत विषय, समस्या यावर खऱ्या अर्थाने आपण आता फक्त न बोलता कार्यवाही करण्यास सज्ज झाले पाहिजे. आपण या पृथ्वीतलावर राहतो तर आपले प्रत्येकाचे या पृथ्वीसंबंधी, पर्यावरणासंबंधी काही कर्तव्य व भूमिका असल्या पाहिजेत हे आपण फार विसरून गेलो आहोत. जे काही करायचे ते शासनाने करावे किंवा दुसºयाने करावे ही प्रत्येकाची भूमिका असते यातच पर्यावरणाचा खुप मोठ्या प्रमाणावर ºहास होताना दिसतो. माणूस बुद्धीमत्ता व स्वार्थाच्या जोरावर अस्थिर विज्ञानाच्या आधारे अंतरिक्षात गेला तिथे तो वास्तव्य करू लागला व तिथेही त्याने प्रदुषण करायला सुरूवात केली. ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या संबंधी तो अधिक बेजबाबदार झाला आहे.अठराव्या शतकाच्या प्रारंभी मनुष्याने कुतूहल महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती व प्रगतीच्या ध्यास या जोरावर निरनिराळे शोध लावण्यास सुरूवात केली त्यात त्याने कपड्यांपासून ते थेट विनाश्रम करू शकेल अशा वाहनापर्यंत समावेश होता हळूहळू तो बुद्धीमत्तेच्या स्वार्थासाठी जोरावर शोधाच्या आहारी गेला की तो आपल्या गरजापेक्षाही जास्त या शोधाचा उपभोग घेऊ लागला. यातून मानवाच्या जीवनात विकृती निर्माण होणार हे त्याच्या मनातही नव्हते. हळूहळू त्याने हवा, पाणी, जमीन, वनस्पती यासारख्या नैसर्गिक घटकांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरूवात झाली. त्याने तयार केलेल्या परंतु त्याला नको असलेल्या निरोपयोगी गोष्टीतो सर्रासपणे हवेत सोडू लागला. पाण्यात मानवनिर्मित घटक निसर्गालाच आव्हान देऊ लागली. निर्सगातील शुद्धता भ्रष्ट करू लागला. प्रदुषणाच्या या राक्षसाने आपले हातपाय पसरविण्यास सुरूवात केली व आज बघता बघता सगळ्याच घटकात तो आत मिसळून गेला आहे आणियाचे विक्राळ रूप आज आपल्याला बघायला मिळत आहे. त्याने सर्व पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणास शह दिला. मानवानेच कळत न कळत स्वत:वर केलेले ते सायलंट किलर आहे. जे भविष्यात मानवाला नष्ट करणार आहे. भारत एकीकडे बलशाही राष्टÑाची स्वप्न बघतो आहे तर दुरसीकडे आपण निर्माण केलेल्या गोष्टींमुळे अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी नद्यांना पूर येतो तर काही प्रदेशात दुष्काळ पडतो आहे. या विरोधाभासी घटनांनी सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. मृदा नापिकी होताहेत, शेतीतून येणाºया पिकातून अन्नधान्यातूनही अनेक रासायनिक घटकामुळे मानवाला कॅन्सर सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मानवाच्या तडाख्यातून गंगा, यमुना, गोदावरी अशा अनेक नद्याही सुटलेल्या नाहीत. दिल्ली सारख्या शहरातून दिवसाला करोडो गॅलन कारखान्याचे व ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. त्यामुळे नद्या धोक्यात आल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक वनस्पती, प्राणी, सजीवांचे जीवन धोक्यात आले आहे. ज्या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करायचे असेल तर आपल्या वसुंधरेसाठी जागृत होऊन पर्यवरणास जपायला हवे. पर्यावरणाचे रक्षण व प्रदुषणाला आळा घातला तरच खºया अर्थाने भूगोल दिन साजरा करण्याचे साध्य होईल.- प्रा. स्रेहल निवृत्ती कासार-मरकड, भूगोल विभाग, व्हि.एन. नाईक महाविद्यालय, नाशिक

टॅग्स :Earthपृथ्वीNashikनाशिक