शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे झाडे लावण्यासाठी होऊ द्या खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:19 IST

पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्देखरेदी करणार ट्री गार्ड : ६६ लाखांचा प्रस्ताव महासभेवर

नाशिक : पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे. तसेच जुन्या वृक्ष संरक्षकांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी २६ लाख ४० हजार रुपये खर्च केले जाणार आहे. अशाप्रकारे वृक्षलागवडीपोटी ६६ लाख रुपये हे संरक्षक जाळ्यांसाठी खर्च केले जाणार आहेत.येत्या महासभेवर संरक्षक जाळ्या खरेदी व दुरुस्तीसंदर्भातील दोन प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. यातील नवीन वृक्ष सरंक्षक खरेदीच्या प्रस्तावात ३९ लाख ९९ हजार ४२५ रुपये खर्चाचे १,८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्यात येणार आहे.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानात महापालिकाही सहभागी होणार असून, मनपा हद्दीत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी केली जात असताना या वृक्षांचे संगोपन व जपणूक करण्यासाठी संरक्षक जाळ्या (ट्री गार्ड) खरेदी उद्यान विभागाने प्रस्तावित केली आहे. त्यासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आले असून, नवीन जाळ्यांची खरेदी व जुन्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.मागील दोन वर्षांत महापालिकेकडून दहा ते बारा फूट उंचीची झाडांची लागवडीचे काम काही संस्थांना दिले होते. त्यांच्याकडून झाडाच्या चार बाजूंना बांबू व हिरवे कापड लावण्याचे काम झाले होते. परिणामी हे बांबू तुटले आणि कापड गायब झाल्याने काही झाडे नष्ट झाल्याचा आरोप स्थायी समितीत सदस्यांकडून करण्यात आला होता. यामुळे आता नवीन वृक्षलागवड करताना सर्वच झाडांंना सरंक्षक जाळ्या लावण्याची मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाweatherहवामान