शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महापालिकेचे झाडे लावण्यासाठी होऊ द्या खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:19 IST

पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्देखरेदी करणार ट्री गार्ड : ६६ लाखांचा प्रस्ताव महासभेवर

नाशिक : पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे. तसेच जुन्या वृक्ष संरक्षकांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी २६ लाख ४० हजार रुपये खर्च केले जाणार आहे. अशाप्रकारे वृक्षलागवडीपोटी ६६ लाख रुपये हे संरक्षक जाळ्यांसाठी खर्च केले जाणार आहेत.येत्या महासभेवर संरक्षक जाळ्या खरेदी व दुरुस्तीसंदर्भातील दोन प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. यातील नवीन वृक्ष सरंक्षक खरेदीच्या प्रस्तावात ३९ लाख ९९ हजार ४२५ रुपये खर्चाचे १,८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्यात येणार आहे.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानात महापालिकाही सहभागी होणार असून, मनपा हद्दीत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी केली जात असताना या वृक्षांचे संगोपन व जपणूक करण्यासाठी संरक्षक जाळ्या (ट्री गार्ड) खरेदी उद्यान विभागाने प्रस्तावित केली आहे. त्यासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आले असून, नवीन जाळ्यांची खरेदी व जुन्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.मागील दोन वर्षांत महापालिकेकडून दहा ते बारा फूट उंचीची झाडांची लागवडीचे काम काही संस्थांना दिले होते. त्यांच्याकडून झाडाच्या चार बाजूंना बांबू व हिरवे कापड लावण्याचे काम झाले होते. परिणामी हे बांबू तुटले आणि कापड गायब झाल्याने काही झाडे नष्ट झाल्याचा आरोप स्थायी समितीत सदस्यांकडून करण्यात आला होता. यामुळे आता नवीन वृक्षलागवड करताना सर्वच झाडांंना सरंक्षक जाळ्या लावण्याची मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाweatherहवामान