लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2016 23:04 IST2016-05-04T22:59:21+5:302016-05-04T23:04:26+5:30

जांबुटके : धरणाची खोली वाढण्याबरोबरच पाण्याचा प्रश्न मिटणार

Launch of mud from people's participation | लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ

 वडनेरभेैरव : तालुक्यातील जांबुटके धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभारंभ तहसीलदार माणिक अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.
धरणातील गाळ काढल्याने धरणाची खोली वाढेल व पाणी साठवण क्षमता वाढेल याकरता लोकसहभागातून शासन, आर्ट आॅफ लिव्हिंग अशा सामाजिक संस्थांच्या मदतीने आठ गावांचा पिण्याचा पाण्याचा मुख्य आधार असलेल्या जांबुटके धरणातील गाळ काढणार आहे. जांबुटके धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणी साचण्याऐवजी नेत्रावती नदीतून वाहून जाते.
यावेळी वडनेरभैरवचे
उपसरपंच रावसाहेब भालेराव, पिंपळणारे उपसरपंच अनिल
कोठुळे, दह्याणे सरपंच शांताराम
भवर, पोलीसपाटील नवनाथ कोठुळे, संपतराव जाधव, सुरेश भवर, बाळासाहेब कोठुळे, महेंद्रसिंह परदेशी, केशव धनाईत,
रामचंद्र पाटील, अशोक गचाले, एकनाथ अहेर, खंडेराव कोठुळे,
सुरेश यशवंते, भाऊसाहेब
गुमनार, विश्वनाथ चव्हाण, शंकर गांगुर्डे, ग्रामसेवक एस. के.
मोरे, शशी वक्ते, समाधान
गचाले, पुंडलिक ठाकरे,
पुंडलिक गांगुर्डे आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Launch of mud from people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.