सटाण्याला चणकापूरचे अखेरचे आवर्तन
By Admin | Updated: June 26, 2014 01:00 IST2014-06-24T21:06:41+5:302014-06-26T01:00:58+5:30
सटाण्याला चणकापूरचे अखेरचे आवर्तन

सटाण्याला चणकापूरचे अखेरचे आवर्तन
सटाणा : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अखेर चणकापूर धरणातील अखेरचे आवर्तन सोडण्यात आल्याने आजपासून शहरास एक दिवसाआड पूर्ववत पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पाच दिवसाआड झालेला पाणीपुरवठा सुरळीत सुरू
झाला आहे. दरम्यान, वरुणराजाने आपली कृपादृष्टी न केल्यास शहरवासीयांना आगामी काळ कठीण ठरणार आहे.
सटाणा शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर
व केळझर धरणातील आवर्तनाबरोबरच जलसाठादेखील संपुष्टात आलेला आहे.
परिणामी शहरात गेल्या दोन आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.
पाच दिवसाआड शहरात पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांनी अत्यंत सोशिक पद्धतीने कुठलाही त्रागा न करता शांतपणे पाणीटंचाईला सामोरे जाणे पसंत केले.
या उन्हाळ्यात सटाणा नगर परिषदेने शहरवासीयांना कमीत
कमी प्रमाणात पाणीटंचाई
जाणवू देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. यामुळे शहरवासीयांनीदेखील पालिका प्रशासनाला सहकार्याची भावना दाखविलेली आहे. मात्र
सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझर व चणकापूर धरणातील पिण्याचे पाण्याचे आवर्तन संपुष्टात आलेले आहे.
दोघा धरणातील जलसाठादेखील संपलेला आहे.
शहराला वेळप्रसंगी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे जलस्रोत आटलेले आहेत. यामुळे शहरात
तीव्र पाणीटंचाईचा सामना
करावा लागत आहे. यामुळे वरुणराजाने आपली कृपादृष्टी लवकर करावी, अन्यथा शहरवासीयांना पाण्यासाठी
मोठ्या संकटाला सोमोर जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)