पूररेषेची सुनावणी अखेर झालीच नाही...!

By Admin | Updated: May 7, 2016 22:04 IST2016-05-07T22:01:16+5:302016-05-07T22:04:37+5:30

पूररेषेची सुनावणी अखेर झालीच नाही...!

The last hearing has not happened ...! | पूररेषेची सुनावणी अखेर झालीच नाही...!

पूररेषेची सुनावणी अखेर झालीच नाही...!

 त्र्यंबकेश्वर : हरित लवादाच्या आदेशाने पाटबंधारे विभागाला त्र्यंबकेश्वरला पूररेषा निश्चित करण्याबाबत तसेच ब्ल्यू लाइन व रेड लाइन निश्चित करण्याचे आदेश दिल्याने शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे पाटबंधारे विभागाचे अभियंता योगेश बराटे, मिसाळ आदि अधिकारी त्र्यंबकेश्वर येथील विश्रामगृहावर आले होते.
यावेळी त्र्यंबकेश्वरमधील नदीकाठावरील हरकतदार लोकांनी आपली बाजू पोटतिडकीने मांडून सुनावणी घेण्याऐवजी लोकांनीच अधिकाऱ्यांना सुनावले.
आजपर्यंत त्र्यंबकेश्वरच्या इतिहासात कधीही आलेल्या
पुरामुळे जीवितहानी अगर वित्तहानी झाल्याचे उदाहरण नाही. अगर तसा इतिहास नाही. त्र्यंबकेश्वर बह्मगिरी गोदावरीचे उगमस्थान असून येथे बालस्वरूपात गोदामाईचा प्रवाह आहे.
तसेच येथे दोन प्रवाह वाहतात. त्यांना म्हातार ओहळ व नीलगंगा संबोधले जाते, तथापि हे दोन नाले उपनद्या नाहीत. त्यामुळे पूर आला तर दोन्ही बाजूंनी कितीही मोठा पूर
आला तरी जेमतेम ६ ते ७
मीटरपेक्षा प्रवाह वाढत नाही. हे येथे जमलेल्या हरकतदारांनी पुराव्यानिशी दाखविले तसा युक्तिवाददेखील केला.
या सुनावणीत उपनगराध्यक्ष संतोष कदम, अमर सोनवणे, मयूर गाजरे, पप्पू शेलार, बाळासाहेब कदम, लोहगावकर, आनंद पाचोरकर, भूषण अडसरे, अनिल दीक्षित, मृणाल शिखरे आदि हरकतदार उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The last hearing has not happened ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.