शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपालिका उमेदवारी अर्जासाठी उद्या अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:43 IST

कळवण तालुका : जातवैधतेशिवाय लढता येणार निवडणूक 

ठळक मुद्देउमेदवाराला निवडून आल्यानंतर बारा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

कळवण : राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता जातवैधता प्रमाणपत्राशिवाय उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आयोगाने वाढविली असून, येत्या १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.राखीव जागांसाठी उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते, मात्र जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्र ारी झाल्या होत्या. याबाबत राज्य सरकारने ग्रामविकास सुधारणा विधेयक मंजूर केल्याने नव्या आदेशानुसार आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, सप्तशृंगगड, नांदुरी, ओतूर, मेहदर, नरूळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, पाळे बुद्रुक, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, वीरशेत, वडाळे (हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे (क), काठरे, गोसराणे या २९ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला निवडणूक होत आहे. १३ मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले होते. या नव्या आदेशामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अडचणीत आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ मार्च असताना अनेकांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने राखीव जागांवर निवडणूक लढवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता.यासंदर्भात तक्र ारी झाल्याने सरकारने ग्रामविकास सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर नव्या आदेशानुसार आता जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवाराला निवडून आल्यानंतर बारा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा पद रद्द होईल. या नव्या निर्णयाने इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.अर्जासाठी १६ मार्चपर्यंत मुदतवाढजातवैधता प्रमाणपत्राचा घोळ, शासकीय सुट्ट्या या कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता पुरेसा अवधी मिळाला नाही. हे लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने गुरु वारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १० (अ) अन्वये तथा राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ दिली आहे. आता नवीन निर्देशानुसार सोमवारपर्यंत (दि.१६) सरकारी सुट्टीचे दिवस वगळून इच्छुकांना त्यांचे नामनिर्देशन पत्र भरता येतील.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक