शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावात लाखो लिटर्स पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:09 IST

वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.

इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.वडाळागावातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीची जणू स्पर्धाच लागली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे. शहरात दररोज सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळती होते. त्यापैकी सुमारे दोन लाख लिटर्स पाण्याची गळती एकट्या वडाळागाव परिसरात होत आहे. अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत असल्याने अधिकृत जोडणीची संख्या कमी असल्याने महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही. यामुळे पालिकेचेदेखील नुकसान होत आहे.गेल्या अनेक वर्षांत येथील ठराविक भागात पाण्याच्या चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. महापालिका यंत्रणेलादेखील पाणीचोरीची ठिकाणी ज्ञात आहेत. परंतु त्यांच्याकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने पाणीचोरीचे सत्र सुरूच आहे. वडाळागाव परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे लाखो रु पयांच्या पाणीपट्टी माध्यमातून महसूल बुडत आहे. तरीही पाणीपुरवठा विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा विभागाला केव्हा जाग येणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.वडाळागाव परिसरातील काही भागांत सातत्याने वाढ होत आहे. मोलमजुरी करणारे तसेच हातगाडीवर व्यवसाय करणारे अनेक लोक या भागात राहातात. बहुतेक नागरिकांनी गुंठेवारी पद्धतीने नोटरीद्वारे जमीन विकत घेतली आहे. येथील मेहबूबनगरसह परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जलवाहिनीतून नळजोडणी अनधिकृतपणे केली आहे.अलीकडेच सुमारे अनधिकृत दोन हजार जोडणी परिसरात असल्याचे निदर्शनात आले होते ही घटना ताजी असतानाच मदिनानगर पाठीमागील परिसरात सुमारे चाळीस नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतली असल्याचे समोर आले. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत असताना पाणीपुरवठा विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त केला आहे.अनधिकृतपणे नळजोडणीमुळे पाणीपुरवठा विभागाचे पाणीपट्टीद्वारे मिळणारा महसूलदेखील बुडत आहे. शिवाय इंदिनरानगर परिसरात सातत्याने सातत्याने कृत्रिम पाणीटंचाईदेखील निर्माण होत आहे.अनधिकृत नळजोडणीचे काय?शहरात अधिकृत नळजोडणी असलेल्या ग्राहकांकडून महापालिका पाणीपट्टी वसूल करते तर अनेकांना नोटिसा देऊन त्यांना भरणा करण्यास भाग पाडले जाते, बंद मीटरप्रकरणी नोटीस देऊन दंडही आकारला जातो तर दुसरीकडे अनधिकृत नळजोडणी माहिती असूनही महापालिका त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई करीत नसल्याचे हा कसला न्याय? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीtheftचोरी