शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

वडाळागावात लाखो लिटर्स पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:09 IST

वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.

इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.वडाळागावातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीची जणू स्पर्धाच लागली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे. शहरात दररोज सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळती होते. त्यापैकी सुमारे दोन लाख लिटर्स पाण्याची गळती एकट्या वडाळागाव परिसरात होत आहे. अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत असल्याने अधिकृत जोडणीची संख्या कमी असल्याने महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही. यामुळे पालिकेचेदेखील नुकसान होत आहे.गेल्या अनेक वर्षांत येथील ठराविक भागात पाण्याच्या चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. महापालिका यंत्रणेलादेखील पाणीचोरीची ठिकाणी ज्ञात आहेत. परंतु त्यांच्याकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने पाणीचोरीचे सत्र सुरूच आहे. वडाळागाव परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे लाखो रु पयांच्या पाणीपट्टी माध्यमातून महसूल बुडत आहे. तरीही पाणीपुरवठा विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा विभागाला केव्हा जाग येणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.वडाळागाव परिसरातील काही भागांत सातत्याने वाढ होत आहे. मोलमजुरी करणारे तसेच हातगाडीवर व्यवसाय करणारे अनेक लोक या भागात राहातात. बहुतेक नागरिकांनी गुंठेवारी पद्धतीने नोटरीद्वारे जमीन विकत घेतली आहे. येथील मेहबूबनगरसह परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जलवाहिनीतून नळजोडणी अनधिकृतपणे केली आहे.अलीकडेच सुमारे अनधिकृत दोन हजार जोडणी परिसरात असल्याचे निदर्शनात आले होते ही घटना ताजी असतानाच मदिनानगर पाठीमागील परिसरात सुमारे चाळीस नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतली असल्याचे समोर आले. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत असताना पाणीपुरवठा विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त केला आहे.अनधिकृतपणे नळजोडणीमुळे पाणीपुरवठा विभागाचे पाणीपट्टीद्वारे मिळणारा महसूलदेखील बुडत आहे. शिवाय इंदिनरानगर परिसरात सातत्याने सातत्याने कृत्रिम पाणीटंचाईदेखील निर्माण होत आहे.अनधिकृत नळजोडणीचे काय?शहरात अधिकृत नळजोडणी असलेल्या ग्राहकांकडून महापालिका पाणीपट्टी वसूल करते तर अनेकांना नोटिसा देऊन त्यांना भरणा करण्यास भाग पाडले जाते, बंद मीटरप्रकरणी नोटीस देऊन दंडही आकारला जातो तर दुसरीकडे अनधिकृत नळजोडणी माहिती असूनही महापालिका त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई करीत नसल्याचे हा कसला न्याय? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीtheftचोरी