शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आठ क्विंटल कांद्याने शेतकऱ्याला केले लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 02:04 IST

कधी कधी ट्रॅक्टरभर कांदा विक्रीसाठी बाजारात नेला तरी शेतकºयाला एक लाख रुपये मिळतीलच याची खात्री नाही; पण केवळ आठ क्विंटल कांद्याने येवला तालुक्यातील महालखेडा येथील शेतकºयाला लखपती बनविले आहे. सोमवारी (दि.२) जिल्ह्यात कांदाने गाठलेल्या उच्चांकी दरामुळे ही किमया घडली आहे.

नाशिक : कधी कधी ट्रॅक्टरभर कांदा विक्रीसाठी बाजारात नेला तरी शेतकºयाला एक लाख रुपये मिळतीलच याची खात्री नाही; पण केवळ आठ क्विंटल कांद्याने येवला तालुक्यातील महालखेडा येथील शेतकºयाला लखपती बनविले आहे. सोमवारी (दि.२) जिल्ह्यात कांदाने गाठलेल्या उच्चांकी दरामुळे ही किमया घडली आहे.परतीच्या पावसामुळे केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातीलही कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशभरात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी असल्यामुळे राज्यभरात कांदा दराने उच्चांक गाठला आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारणे निर्यातबंदीबरोबरच व्यापाऱ्यांवर साठ्याच्या मर्यादा घालण्यासारख्या उपाययोजना केल्या, तरीही कांदा दरावर त्याचा कोणताही परीणाम झाला नाही. मध्यंतरी शासनाने कांदा आयातीचाही निर्णय घेतला, तरीही कांदा दरावर त्याचा विशेष परिणाम जाणवत नाही. सोमवारी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याने १२,००० रुपयांचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील उमराणे बाजार समितीत १२,५००, सटाणा बाजार समितीत १२,३००, तर येवला बाजार समितीत १२,२५० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला गेला. काही बाजार समित्यांमध्ये एखाद्या शेतकºयाला उच्चांकी दर मिळाला असला तरी सटाणा बाजार समितीत आवक झालेल्या एकूण कांद्याच्या सरासरी २५ टक्के कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे. सटाण्यात सोमवारी साधारणत: ६००० क्विंटल कांदा आवक झाली होती. दोन व्यापारी कंपन्यांनी अधिक कांदा खरेदी केल्याचे सांगण्यात आले.येवला बाजार समितीत महालखेडा येथील पुंडलिक अहिलाजी हांडे या शेतकºयाने आपला केवळ ८.६५ क्विंटल उन्हाळ कांदा विक्रीसाठी आणला होता. या शेतकºयाला उच्चांकी १२,२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांदा विक्रीतून या शेतकºयाला एकूण १,०५,९६२.५० रुपये, तर खर्च वजा जाता १,०५,८७० रुपये उत्पन्न मिळाले आहे.जिल्ह्यात पावसामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकºयांनी पुन्हा रोपांची लागवड केली आहे. रोपे लागवडीयोग्य होण्यास अद्याप अवधी असल्याने पुढील महिना- दोन महिने कांदा भाव खाणार असे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड