शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाणी, वीजपुरवठ्याअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:43 IST

शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीजपुरवठा खंडित आहे.

नाशिक : शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीजपुरवठा खंडित आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी करूनदेखील सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत.रविवारी (दि.४) झालेली अतिवृष्टी तसेच पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, परंतु रहिवासी क्षेत्र आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले.जे नागरिक परिसरात राहत आहेत त्यांनादेखील मूलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागला. शहरातील गोदाकाठी तसेच नासर्डी आणि वालदेवी काठी असलेल्या हजारो नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला आहे. पुरामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहेत. पथदीप किंवा विजेचे पोल वाकल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. आधीच पुराचे पाणी त्यात वीजपुरवठा खंडित अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना राहावे लागले. परंतु त्याचप्रमाणे शहरात शेकडो मार्गांवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.शहरातील काही भागांत तर वीजपुरवठ्याबरोबरच जलवाहिन्यादेखील फुटल्या आहेत. त्यामुळे विजेबरोबरच पाणीपुरवठा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे याबाबत तक्रारी केल्यानंतरदेखील आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाहणी केली नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसelectricityवीजWaterपाणी